गुन्हे विषयक
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोपरगावात चलचित्रण कॅमेरे बसवा-…यांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गुन्हेगारीची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई बरोबरच शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी चलचित्रण करण्यासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवणे गरजेचे असून मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी ते बसवावे अशी महत्वपूर्ण मागणी पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल-विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते रविकिरण शंकरराव ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांनव्ये केले आहे.
कोपरगाव शहरात अवैध व्यवसाय करणारे दोन नंबरचे भाई वाढले आहे,त्यांची भाईगिरी जनतेची शांतता धोक्यात आणत आहे.छोट्या चोऱ्यामाऱ्या करणारे भुरटे चोरटे,वाहन चोर,भरधाव वेगात चालुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारे भुरटे आदींचा सुळसुळाट झाला आहे.आपल्या ‘बुलेट’ वाहनास ‘फटाका’ सायलंसर लावून शहराचे ध्वनी प्रदूषण करणारे विदूषक उजळ माध्याने वावरत आहे परिणामी दवाखाने व त्यातील रुग्ण आणि लहान बालके यांचे आरोग्य धोक्यात आले असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना पोलीस दिसत नाही.
कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई थिटी पडत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.काही महिन्यात नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ०६ लाखांच्या गुटख्यासह अनेक गुन्हे उघड करून धमाल उडून दिली होती.त्या नंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याकडे नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाची वक्र दृष्टी झाली आहे.त्यांनी कोपरगाव तालुक्यात अवैधरित्या गॅसचे रॅकेट दि.२ जानेवारी २०२३ रोजी रंगेहात पकडले होते.त्यात कॅप्सूल अशोक लेलंड कंपनीच्या टँकरसह (क्रं.एम.एच.४३ बी.जी.७१५०) दुसरा त्याच कंपनीचा दोस्त कंपनीचे लहान वहान (क्रं.एम.एच.११ सी.एच.४४८०) ३० गॅस टाक्या असा सुमारे २७ लाख ९७ हजार ७१८ रुपयांचा मोठा ऐवज जप्त केला होता.त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती.यात कमी होण्याची कोणतीही चिन्हे अद्याप तरी दिसत नाही हे विशेष ! या पार्श्वभूमीवर बजरंग दलाचे कार्यकर्ते रविकिरण ढोबळे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,”शहरातील अनेक प्रश्नांबरोबर शहरात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील असंख्य शाळकरी मुले-मुली,महिला आदींना घरगुती कामानिमित्त शहरात एकट्याने जावे लागते,याखेरीज पायी फिरणारे जेष्ठ नागरिक व तसेच शहरातील दुर्बल घटक,मध्यमवर्गीय,कष्टकरी नागरिक वांरवार दादागिरीचे बळी ठरत आहे.अवैध व्यवसाय करणारे दोन नंबरचे भाई वाढले आहे,त्यांची भाईगिरी जनतेची शांतता धोक्यात आणत आहे.छोट्या चोऱ्यामाऱ्या करणारे भुरटे चोरटे,वाहन चोर,भरधाव वेगात चालुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारे भुरटे आदींचा सुळसुळाट झाला आहे.आपल्या ‘बुलेट’ वाहनास ‘फटाका’ सायलंसर लावून शहराचे ध्वनी प्रदूषण करणारे विदूषक उजळ माध्याने वावरत असून त्यामुळे दवाखाने व त्यातील रुग्ण आणि लहान बालके यांचे आरोग्य धोक्यात आले असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना पोलीस दिसत नाही.वाहने चोरणारे तसेच काही असामाजिक तत्व आदींचा सुकाळ झाला आहे.
कोपरगाव बेट येथे दोन गटात मोठी झोम्बी झाली त्याला काही दिवसही झालेले नाही त्यामुळे सामान्य नागरिकांत मोठी दहशत निर्माण झाली आहे.समाजातील काही घटक त्याचे हकनाक बळी जात आहेत.या असामाजिक तत्वांना आळा घालण्यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी सि.सि.टी.व्ही.बसविणे नितांत गरजेचे असल्याची मागणी शेवटी रविकिरण ढोबळे यांनी शेवटी केली आहे.