जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…त्या दरोड्यातील आणखी तीन आरोपी गजाआड,कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्यावर डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यानीं मारुती एर्टीगा कारचा वापर करत भिवंडीहून औरंगाबादकडे लातूर जिल्ह्यातील आठ म्हशी घेऊन चाललेला विटकरी रंगाचा आयशर (क्रं. एम.एच.05,डी. के.757)ट्रक सह सहा लाख 23 हजार पाचशे रुपयांच्या ऐवजासह 16 सप्टेंबरच्या रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लुटून फरार झालेले आरोपीपैकी आणखी तीन आरोपी कोपरगाव तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.आता एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे.

या पूर्वी भैया पडवळ,नितीन पडवळ,किरण आरणे, राहुल खरात आदी प्रमुख दरोडेखोरांना अटक केली होती तर अन्य आरोपी मात्र फरार होते.मात्र पोलीस त्यांच्या मागावर होते.अखेर काल रात्री पाळत ठेऊन आज सकाळ पर्यंत शिर्डी पानमळा येथून नवीन अमोल मकासरे,विठ्ठलवाडी येथून राजू उर्फ सुरेश उत्तम भालेराव,एर्टीगा चालक एर्टीगासह बापू उर्फ वाल्मिक कटारे,हिलालपुर ता.वैजापूर आदी तिघांना अटक करून कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,लातूर जिल्ह्यातील वरील क्रमांकांचा आयशर ट्रक वरील चालक हज्जू अमीन शेख (वय-22) रा.लामजमा ता.औसा जिल्हा लातूर हा भिवंडी येथून खरेदी केलेल्या प्रत्येकी पंचवीस हजार किमतीच्या एकूण दोन लाख रुपये किमतीच्या आठ म्हशी घेऊन औरंगाबादकडे मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-नागपूर राज्य मार्गाने जात असताना त्याला कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत आल्यावर एक पांढऱ्या रंगाच्या एर्टीगामध्ये चार अनोळखी दरोडेखोरांनी येऊन ती रस्त्यात आडवी घालून चालकास कोयता व अन्य हत्यारांचा धाक दाखवून त्यातील आठ म्हशी,चार लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक,अठरा हजार रुपये रोख,पाचशे रुपये किमतीचा मोबाईल,असा सहा लाख 23 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता.या घटनेची ट्रक चालक हज्जू शेख याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर देऊन गुन्हा दाखल केला होता.या घटनेचा तपास पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत होते.त्यांनी या पूर्वी भैया पडवळ,नितीन पडवळ,किरण आरणे, राहुल खरात आदी प्रमुख गुन्हेगारांना अटक केली होती तर अन्य आरोपी मात्र फरार होते.मात्र पोलीस यांच्या मागावर होते.अखेर काल रात्री पाळत ठेऊन आज सकाळ पर्यंत शिर्डी पानमळा येथून नवीन अमोल मकासरे,विठ्ठलवाडी येथून राजू उर्फ सुरेश उत्तम भालेराव,एर्टीगा चालक एर्तीगासह बापू उर्फ वाल्मिक कटारे,हिलालपुर ता.वैजापूर आदी तिघांना अटक करून कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी या गुंह्यातील आरोपीना अटक करून त्यांना गजाआड केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close