आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोनावाढ आटोक्यात येईना!

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ३७३ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या २३६ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.४५ टक्के आहे.तर एकूण २२ हजार ०९६ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८८ हजार ३८४ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १५.२७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ०८८ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९१.५५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-३० बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण-१३ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.कोपरगाव पुरुष वय-२४,३४,८८,महिला वय-२०, इंदिरा पथ पुरुष वय-३४,साबळे वस्ती पुरुष वय-४१,राम मंदिर रोड पुरुष वय-२६,सराफ बाजार वय-१९,६०,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-२१,वडांगळे वस्ती वय-३६,बालाजी प्लाझा -पुरुष वय-६३,जानकी विश्व पुरुष वय-६३,आदींचा समावेश आहे.
तर तालुका हद्दीतील १७ रुग्ण पुढील प्रमाणे कान्हेगाव महिला वय-२३,रवंदे तीन पुरुष वय-३१,४८,२२,कुंभारी पुरुष वय-६०, तर शिंगणापूर पुरुष वय-३५,२५,ब्राम्हणगाव पुरुष वय-६९,रांजणगाव देशमुख वय-५३,मुर्शतपुर पुरुष वय-४५,कोळपेवाडी येथील एक पुरुष वय-५८,सांगवी भुसार पुरुष वय-६८,महिला वय-६४,चांदेकसारे पुरुष वय-३३,खोपडी एक पुरुष वय-७६,कोकमठाण महिला वय-६५,पोहेगाव महिला वय-७० आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.