जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेतकऱ्यांचे वीज आंदोलन यशस्वी,कोपरगावात मागण्या मान्य

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावसह राज्यात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम मोठ्या उत्साहात सुरु झाला असून विद्युत पंपासाठी महावितरण कंपनी मात्र रात्री पूरवठा करत होती.त्या अन्याया विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतेच ‘आमरण उपोषण’ करून महावितरण कंपनीला वेठीस धरले असता,’महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकऱ्यानी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीज पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला असून या खेरीज अन्य दहा मागण्या मान्य केल्या असून याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

“कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन दिवस रात्री १२ ते सकाळी ०८ तर पुढील चार दिवस सकाळी ८.५० ते दुपारी ४.५० वाजता पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.अतिभारीत वाहिन्यांवर वीज भार कमी करण्यासाठी कॅपॅसीटर बसविणार आहे.या शिवाय ब्राम्हणगाव,वारी येथील नवीन उपकेंद्रात विद्युत रोहित्र भार वाढविण्याचे आदेश अंतिम टप्यात असल्याची तर रवंदे येथील उपकेंद्रातील क्षमता वाढ हि प्राधान्याने ए.सी.एफ.व आर.डी.एस.एस.मध्ये घेण्यात आली आहे”-उपकार्यकारी अभियंता,महावितरण कंपनी,ग्रामीण उपविभाग कोपरगाव.

अ,नगर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात आहे.शेती जगवण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पिकांना रात्री पाणी देत आहेत.एकीकडं राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे.रक्त गोठवणारी थंडी पडण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.तर दुसरीकडं सरपटणाऱ्या व वन्य प्राण्यांचा धोका निर्माण झाला होता.अशा स्थितीत रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी चिंतेत होते.शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री जंगली श्वापदापासून संरक्षणासाठी शेतात पहारा द्यावा लागत होता.याबाबत सत्तेत येणारे राजकारणी कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.विरोधात असल्यावर आकंठ ओरडून शेतकऱ्याचा समस्या मांडताना दिसणारे राजकारणी सत्तेची ऊब मिळताच शेतकऱ्यांच्या मांगण्याना कोलदांडा घालताना दिसत होते.या विरोधात कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रण पेटविण्याचा निर्णय घेतला होता.त्या नुसार शेतकरी कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,सेनेचे प्रवीण शिंदे,तुषार विध्वंस,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे,आदींनी या पूर्वी दि.०२ डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषण केले होते.मात्र त्यावर अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर मागण्या कळवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी आगामी ०२ जानेवारी रोजी महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर,’आमरण उपोषण’ सुरु केले होते.

सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,उद्धव शिवसेना नेते मनोज कपोते,प्रवीण शिंदे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,तुषार विध्वंस,काँग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे,योगेश गंगवाल,सोपान देवकर,अनिल गायकवाड,मनोज कपोते,अड्.दिलीप लासुरे,अड्.नितीन पोळ,विजय जाधव आदीं शेतकऱ्यांचा समावेश होता.

दरम्यान या आंदोलनाची दखल महा वितरण कंपनीला घ्यावी लागली असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आहे.

त्यात तीन दिवस रात्री १२ ते सकाळी ०८ तर पुढील चार दिवस सकाळी ८.५० ते दुपारी ४.५० वाजता पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.अतिभारीत वाहिन्यांवर वीज भार कमी करण्यासाठी कॅपॅसीटर बसविणार आहे.या शिवाय ब्राम्हणगाव,वारी येथील नवीन उपकेंद्रात विद्युत रोहित्र भार वाढविण्याचे आदेश अंतिम टप्यात असल्याची तर रवंदे येथील उपकेंद्रातील क्षमता वाढ हि प्राधान्याने ए.सी.एफ.व आर.डी.एस.एस.मध्ये घेण्यात आली असल्याची लेखी माहिती दिली असून नादुरुस्त विद्युत रोहित्र विनामोबदला दुरुस्त करण्याचे आश्वासन शेवटी दिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close