जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात मनसेचे उपोषण,पालिका प्रशासनाचे आश्वासन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ रोड ते कोर्ट रोड यावरील झालेले अतिक्रमण काढण्यासह अन्य मागण्यासाठी आज शनिवार दि.२५ जानेवारी पासून कोपरगाव नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सुरु केले होते.मात्र पालिका प्रशासनाने व जिओ कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी लेखी हमी दिल्याने अखेर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते मिटविण्यात पालिका प्रशासनास यश आल्याने आता प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

दरम्यान स्वामी समर्थ मंदिर ते कोर्ट रोड या मार्गाबाबत मिळालेली माहितीचा अशी कि,हा रस्ता १९८८ पर्यंत नगररचना विभागाच्या प्लॅनमध्ये होता मात्र तो २०१३ च्या प्लॅनमधून गायब झाला होता.त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी पुन्हा एकदा विशेष सर्वसाधारण सभेत त्याची परवानगी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याची लेखी हमी यावेळी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरात मार्च २०११ साली अतिक्रमण मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे दोन हजार दुकाने हटविण्यात आली. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विस्थापितांना न्याय देण्याच्या बाता मारल्या मात्र प्रत्यक्षात कोणीही खरे उतरले नाही.अनेक वेळा अनेक निवडणुकात या नागरिकांना आश्वासनाची खैरात करण्यात आली. मात्र ती सर्व आश्वासने हवेत विरली.आज जवळपास दहा वर्षाचा कालखंड उलटत येऊनही या नागरिकांना व व्यापाऱ्यांना न्याय मिळाला नाही.उलट दर निवडणुकीत त्यांच्या जखमेला मीठ चोळण्याचे काम राजकीय नेत्यांनी केले.वर्तमानात कोपरगाव शहरातील पोलीस ठाणे ते कोर्ट रोड या दरम्यान नागरिकांची व वाहनाची मोठी गर्दी असते या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जुना रस्ता असलेला स्वामी समर्थ रस्ता ते कोर्ट रस्ता अतिक्रमण काढून मोकळा केला तर वाहतुकीचा बराच ताण कमी होईल.

कोपरगाव शहरात येवला रस्त्यालगत नगरपरिषद शाळेजवळ ‘जिओ’ कंपनीने अवैधरित्या आपला मनोरा उभा केल्याने मोठा पेच निर्माण केला होता. आता हा मनोरा येत्या २० फेब्रुवारी पर्यंत काढण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

मात्र या कडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे.या निषेधार्थ मनसेने हे आंदोलन पुकारले होते.आता नगरपरिषद या बाबत काय भूमिका घेते या कडे नागरिकांचे लक्ष लागले असताना काळ सायंकाळी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी नगरपरिषदेच्या वतीने आगामी विशेष सर्वसाधारण सभेत हा विषय घेऊन त्यास मंजुरी मिळवून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.तर कोपरगाव शहरात येवला रस्त्यालगत ‘जिओ’ कंपनीने अवैधरित्या आपला मनोरा उभा केल्याने मोठा पेच निर्माण केला होता. आता हा मनोरा येत्या २० फेब्रुवारी पर्यंत काढण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. उपोषणास उपजिल्हाप्रमुख संतोष गंगावल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सतीश काकडे,अलिमभाई शहा,संतोष गंगवाल,अतिष शिंदे,अनिल गाडे,सचिन खैरे,जावेदभाई शेख,निलेश काकडे,आदींच्या सह्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close