जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात एक अर्ज अवैध,तर बावीस अर्ज ठरले वैध,आता माघारीकडे नागरिकांचे लक्ष

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्राप्त झालेल्या एकूण तेवीस जणांचे बत्तीस अर्ज प्राप्त झाले होते त्यात आज सकाळी छानणीच्या वेळी बाळासाहेब तुकाराम दीक्षित यांचा अर्ज सुचकांच्या सह्या संशयास्पद असल्याने अवैध ठरल्याने तो बाद करण्यात आल्याने आता कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आता बावीस अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण २३ उमेदवारांचे ३२ अर्ज प्राप्त झाले होते.आज सकाळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता विविध पक्षांच्या उमेद्वारानसमवेत तर काही प्रतिनिधींच्या समक्ष अर्जाची छाननी करण्यात आली त्यात बाळासाहेब तुकाराम दीक्षित यांचा अपक्ष दिलेला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी सुचकांच्या सह्या संशय निर्माण करणाऱ्या ठरल्याने बाद ठरविला आहे.

राज्य विधानसभेची निवडून येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.त्या साठी नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख चार ऑक्टोबर होती त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण २३ उमेदवारांचे ३२ अर्ज प्राप्त झाले होते.आज सकाळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता विविध पक्षांच्या उमेद्वारानसमवेत तर काही प्रतिनिधींच्या समक्ष अर्जाची छाननी करण्यात आली त्यात बाळासाहेब तुकाराम दीक्षित यांचा अपक्ष दिलेला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी सुचकांच्या सह्या संशय निर्माण करणाऱ्या ठरल्याने बाद ठरविला आहे.त्यामुळे तो घोळ उशिरापर्यंत सुरु होता.त्यामुळे एकुण – २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे.तसेच अशोक विजय गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामार्फत उमेदवारी अर्ज असल्याचे दर्शवून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्या सोबत सदर पक्षाचा ए. बी. अर्ज न जोडल्याने त्यांचा पक्षाचा अर्ज अवैध ठरवला आहे.मात्र त्यांचा अपक्ष उमेदवारी वैध ठरविण्यात आला आहे.त्यामुळे आता निवडणूक रिंगणात
वैध उमेदवारांची खालील नावे रिंगणात शिल्लक राहिली आहेत.ती पुढील प्रमाणे आशुतोष अशोकराव काळे (नँशनँलिस्ट काँग्रेस पार्टी),स्नेहलता बिपीनदादा कोल्हे (भारतीय जनता पार्टी), माधव सखाराम त्रिभुवन (बहुजन समाज पार्टी), कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी), कोल्हे शितल दिगंबर (हिंदूस्थान जनता पार्टी), अशोक विजय गायकवाड (अपक्ष),आगवण ज्ञानदेव देवराम (अपक्ष),आढाव नारायण माधवराव (अपक्ष), आभाळे नानासाहेब मुरलीधर (अपक्ष),आव्हाड प्रभाकर सिताराम (अपक्ष),आहिरे मगन पांडुरंग (अपक्ष), उकिरडे सुदाम पंढरीनाथ (अपक्ष),काळे अशोक नामदेव (अपक्ष),खाटिक अल्लाउद्दीन समशुभाई (अपक्ष), टेके रावसाहेब चांगदेव (अपक्ष),दिलीपराव मारुतीराव तिडके (अपक्ष), परजणे राजेश सखाहरी (अपक्ष),राजेश नामदेवराव परजणे(अपक्ष),लोंढे शरद लक्ष्मण (अपक्ष), वहाडणे विजय सूर्यभान(अपक्ष),शाह अलिम छोटू (अपक्ष),साळुंके दिपक गणपतराव (अपक्ष).आदींचा त्यात समावेश आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सोमवार दि.७ आँक्टोबर असून या दिवशी दुपारी ३ पर्यंत अंतिम वेळ राहणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close