जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या नगरपरिषदेने लावले पथदिवे,नागरिकांत समाधान

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नजीक असलेला पूर्वी नगरपरिषद हद्दीच्या बाहेर असलेला त्रिशंकु भागाचा आता नगर परिषद हद्दीत समावेश होऊन परिसरात गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या पथदिव्यांचा प्रश्न प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करुन मार्गी लागला असुन पंचवीस वर्षात पहिल्यांदा पाथदिवे लागले असल्याचे माहिती नगरसेविका दिपा वैभव गिरमे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या कित्येक वर्षापासुन शहराजवळ असलेल्या काही भाग हा नगरपरिषद हद्दीच्या बाहेर सल्याने तो धड ना नगरपरिषद हद्दीत होता ना ग्रामपंचायत हद्दीत होता.त्यामुळे या भागाला कोणीही वाली नव्हते.त्यामुळे रस्ते,वीज,पिण्याचे पाणी,सांड पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी आणि तत्सम सुविधांपासून हा भाग वंचित होता मात्र आता तो नगर परिषद हद्दीत समाविष्ट झाल्याने विकास मार्ग मोकळा झाला आहे-दीपा गिरमे,नगरसेविका,कोपरगाव नगरपरिषद.

गेल्या कित्येक वर्षापासुन शहराजवळ असलेल्या काही भाग हा नगरपरिषद हद्दीच्या बाहेर सल्याने तो धड ना नगरपरिषद हद्दीत होता ना ग्रामपंचायत हद्दीत होता.त्यामुळे या भागाला कोणीही वाली नव्हते.त्यामुळे रस्ते,वीज,पिण्याचे पाणी,सांड पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी आणि तत्सम सुविधांपासून हा भाग वंचित होता.त्यामुळे नागरिकांच्या अनेक सुविधा मिळण्यात अडचण येत होती.त्यामुळे रस्ते,पाणी,आरोग्य आदि विविध प्रश्न गंभीर झाल्यामुळे या भागातील सर्वच नागरिक सुविधांपासुन वंचित राहत होते.या भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी अनेकवेळा नागरिकांनी प्रशासनाकडे करुन देखील न्याय मिळाला नाही.तथापि हि समस्या सरकारने काही दिवसापूर्वी संपवली असून या भागातील नागरिकांनी सदरचा प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेवुन शासनदरबारी पाठपुरावा करुन शहरातील हद्द वाढ करण्यात यश मिळवले आहे. या प्रभागात असलेल्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांना देखील मार्ग मोकळा झाला.या प्रभागासह परिसरात रस्त्यालगत पथदिवे नसल्याने चोरीचे प्रमाण देखील वाढले होते.महिला,युवक,ज्येष्ठ नागरिकांना देखील रात्रीच्या वेळी रस्त्याने जाण्या-येण्यास त्रास होत होता व जोखीमही मोठी होती.त्यांमुळे याबाबत या प्रभागातील महिला नगरसेविका दिपा गिरमे यांनी जिल्हाधिकारी, नगरपरिषदेसह इतर प्रशासनाच्या विभागाकडे सतत पाठपुरावा करुन पथदिवे मंजुर केले आहे. व त्यांनी केलेल्या पाठपुरावामुळे प्रभागासह परिसरात ऐन दिवाळीच्या दिवशी रस्त्यावरील पथदिवे सुरु झाले आहे.त्यामुळे हा संपूर्ण परिसर वर्षानंतर प्रकाशमय झाला आहे.त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेसह इतर प्रशासनासह,नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगरसेविका दिपा गिरमे,वैभव गिरमे यांचे आभार व्यक्त करुन समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close