कोपरगाव तालुका
लक्ष्मीनगरात तालुका प्रशासन घेणार हा निर्णय

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात पहिला महिला रुग्ण सापडून आता चौदा दिवसाचा कालखंड संपल्याने कोपरगाव तालुका प्रशासन आता नागरिकांना आपल्या प्राथमिक व अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शुक्रवार पासून थोडी ढिल देणार असून त्यात नागरिकांना आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीस बाहेर पडून भाजीपाला व त्याच भागातून किराणा माल खरेदी करता येणार असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान हि टाळेबंदी लगेच उठणार नसली तरी नागरिकांना आपल्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना भाजीपाला व किराणा त्या भागात खरेदी करण्यासाठी सूट देण्यात येणार आहे.भाजीपाला व्यापारी हातगाडी घेऊन त्या भागात जाऊ शकतील.नागरिकांनी आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला या खरेदीसाठी पाठविण्यास परवानगी देण्यात आली आहे.नागरिकांनी एका वेळी बाहेर पडू नये-योगेश चंद्रे-तहसीलदार कोपरगाव.
कोपरगाव नगरपालिका हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर या उपनगरात एक ६० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल १० एप्रिल रोजी प्राप्त झाल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती.त्यानंतर त्यात त्या महिलेचे निधन झाले होते.त्यामुळे खडबडून जागे झालेल्या तालुका व शहर प्रशासनाने त्याच रात्रीच हा भाग सील केला होता नजीकचे उपनगरे सील केली असून त्यांतील सर्व कुटुंबांची तपासणी सुरु केली होती.या खेरीज या भागातील प्रत्येक गल्लीत सोडिअम हायपोक्लाराईडची फवारणी सुरु केली होती.दरम्यान या रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या जवळपास अठरा जणाची तपासणी करण्यात आली होती सुदैवाने ते सर्व संशयित निरंक निघाल्याने त्यांना हॉटेल स्पॅन येथे वैद्यकीय देखरेखिखाली ठेवण्यात आलेले आहे.पर्यंत सलग चार दिवस १४ एप्रिल अखेर कोपरगाव शहरात रुग्णालये व संलग्न औषधालयें वगळता संपूर्ण शहराला टाळेबंदी ठोकली होती.त्यानंतर किराणा,भाजीपाला,दूध,फळे,आदी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.व नागरिकांनी आपल्या कोणत्याही कामासाठी आता घराबाहेर पडता येणार नाही अशी तंबी देऊन लक्ष्मीनगर,साईनगर,धारणगाव रस्ता परिसर आदी ठिकाणी स्वतंत्र पोलीस बळ तैनात करण्यात आले होते.त्या घटनेला शुक्रवारी २४ एप्रिल रोजी चौदा दिवस झाले आहे.त्यामुळे नागरिक घरात प्रदीर्घकाळ बसून कंटाळल्याने प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते.