जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात घरपट्टी कमी करा…या पक्षाची पुन्हा तिसऱ्यांदा मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील मालमत्ता धारकांना १९६५ चे कलम-११९ (१) (२) अन्वये कर (घरपट्टी) वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.पण काही मालमत्तांचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे अनेकांना अतिशय मोठ्या प्रमाणात घरपट्टी आकारली गेल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून भाजपने याबाबत पुन्हा तिसऱ्यांदा निवेदन देऊन आपल्या असंतोषला वाट मोकळी करून दिली आहे.

“पालिकेने कर आकारणी करतांना अनेक त्रुटी राहिल्याने अवाजवी घरपट्टी आकारण्यात आल्याचे मान्य करून पुन्हा एकदा नव्याने पडताळणी करून सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्यात येतील असे आश्वासन दिल्याने मालमत्ता धारकांना दिलासच मिळालेला आहे.आता यानंतर नागरिकांनी जुन्याच दराने आलेले कर (घरपट्टी) वेळेवर भरणे गरजेचे आहे.३१ डिसेंबरच्या आत कर भरणा करावा अन्यथा नाहक शास्तीचा भुर्दंड पडू शकतो”-विनायक गायकवाड,अध्यक्ष,कोपरगाव शहर,भाजप.(वसंत स्मृती)

कोपरगाव नगरपरिषदेने नुकत्याच महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ चे कलम ११९(१)(२) अन्वये मालमत्ता कराच्या वाढीव दराने नोटिसा काढल्या आहेत.त्यात सन-२०२२-२३ ते २०२६-२७ असा कालावधी दर्शवला आहे.करयोग्य क्षेत्रफळ,करयोग्य मूल्य,संकलित कर,विशेष शिक्षण कर,अग्निशामक कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,वृक्ष कर असे अवाजवी कर लावल्याचा नागरिकांचा आरोप आहे.त्या नोटीसीत नावात काही बदल,चूक,कोणतीही हरकत असल्यास पालिका मुख्याधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविण्यास सांगितले आहे.मात्र काही नागरिक बाहेरगावी राहत असून काही बाहेर गावी गेलेले आहे.त्यांना नोटिसा मिळण्याची शक्यता कमी आहे.व त्यासाठी अखेरची मुदत ३ ऑक्टोबर २०२२ अशी दिली आहे.त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना साथीने दोन वर्ष नागरिकांचे कंबरडे आधीच मोडले असतांना पालिकेने हा तुघलकी निर्णय घेतला आहे तो नागरिकांना पचनी पडलेला नाही.त्यामुळे आधीच निष्ठावान भाजपचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आधीच आवाज उठवला होता त्याबाबत दोन वेळा निवेदन दिले होते.आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवेदन देऊन यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टी (वसंत स्मृती कार्यालय)चे शहराध्यक्ष विनायक गायकवाड,जेष्ठ नेते सतिश कृष्णानी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुन्हा एकदा शिष्टमंडळाने प्रशासक मुख्याधिकारी-प्रशासक शांताराम गोसावी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.त्यावेळी त्यांनी कर आकारणी करतांना अनेक त्रुटी राहिल्याने अवाजवी घरपट्टी आकारण्यात आल्याचे मान्य केले आहे.

दरम्यान नव्याने हद्दवाढ झालेल्या मालमत्तांवर अवाजवी कर आकारणी करू नये अशीही मागणी करण्यात आली.त्यावेळी गावठाण भागाप्रमाणेच कर आकारणी करण्याचे मान्य करण्यात आले असल्याने त्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.त्याचप्रमाणे त्या भागातील नागरिकांकडून दाम दुपटीने पाणी पट्टी वसूल करू नये अशीही मागणी करण्यात आली.यानंतर कोपरगाव नगरपरिषदेकडे हरकती नोंदविल्या नाही तरी चालतील.कारण सर्वच प्रकरणात नव्याने कर आकारणी केली जाणार असल्याचे यावेळी झालेल्या चर्चेत ठरलेले आहे.कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या योग्य प्रतिसादामुळे यावेळी भाजपने समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close