आंदोलन
सरपंच पद गमावले;आता जागाही जाणार ! ग्रामस्थांची पंचाईत

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तिळवणी ग्रामपंचायतचे काळे गटाचे सरपंच गोविंद साकु पगारे यांचे सरकारी जागेत अतिक्रमण करून राहत असल्याचे कारणावरून सरपंचपद जिल्हाधिकारी यांनी काढून घेण्याचा निर्णय घेतला असताना आज त्याच गावातील ग्रामस्थांनी ४८ ग्रामस्थांनी आम्हाला सरकारी गट क्रं.१०० मध्ये अवैधरीत्या राहू द्या” अशी विनवणी करत तहसीलदार महेश सावंत आणि गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेकडे धावा केला होता.मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी ही बाब जिल्हाधिकारी याचे कार्यक्षेत्रात असल्याचे सांगून त्यांना सदर जागा देण्यास नकार दिला आहे.त्यामुळे आधी सरपंचपद गमावले आता घराची जागाही जाणार असल्याची जोरदार चर्चा तीळवणी आणि शिरसगाव परिसरात सुरू झाली आहे.

दरम्यान या १०० क्रमांकाच्या गायरान क्षेत्रात जवळपास ४८ ग्रामस्थ आतिक्रमण करून राहत असून त्यांना वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाने तीळवणी ग्रामपंचायतीने चार दिवसांपूर्वी नोटिसा काढून त्यांचे अतिक्रमण काढून घेण्यास बजावले आहे.त्यामुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी आज कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेकडे धावा बोल केला होता.मात्र त्यांना त्यात अपयश आले आहे.
सरकारी जागेत अतिक्रमण करून राहिल्याने अनेकांचे सरपंचपद गेल्याची उदाहरणे कोपरगाव तालुक्यात कमी नाही.या आधी मागील पंचवार्षिक निवडणुकीत वेस-सोयगाव ग्रामपंचायत मध्ये असलेले अपक्ष उमेदवार यांचे राजकीय शिमग्यात सरपंचपद गेल्याने खळबळ उडाली होती.आता तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तीळवणी ग्रामपंचायतीची निवडणूक चार वर्षापूर्वी झाली होती.त्यात सर्वच्या सर्व ०७ जागा विद्यमान आ.आशुतोष काळे यांच्या गटाच्या ताब्यात आल्या होत्या तर माजी आ.कोल्हे गटास भोपळा फोडता आला नव्हता.सदर सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्या जागी गोविंद साकू पगारे यांची निवड जनतेतून झाली होती.मात्र त्यांना तो आनंद फार दिवस घेता आला नाही.त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार सौरभ भिवसेन पगारे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे दिनाक १० नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रारी अर्ज करून विद्यमान सरपंच गोविंद पगारे यांच्या आनंदात विरजण टाकले होते.ते सरकारी गायरान असलेल्या गट क्रमांक १०० मध्ये अतिक्रमण करून राहत असल्याची बाब अहील्यानगर जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली होती.त्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे विवाद (क्रं.९१/२०२३) उपस्थित करण्यात आला होता.

दरम्यान याबाबत आता सरपंच गोविंद पगारे यांनी नाशिक येथील आयुक्तांकडे अपील दाखल केले असल्याची माहिती हाती आली आहे तर ग्रामपंचायत निवडणुकीस केवळ एक वर्षे बाकी असल्याने हे सरपंचपद खरोखर जाणार की कायदेशीर कचाट्यात अडकून कालावधी पूर्ण करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान याबाबत त्यांनी आपल्या जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत चौकशी केली होती.त्यात ते दोषी आढळले होते.परिणामी त्यांनी दिनाक २० फेब्रुवारी २०२५ रोजी आदेश पारित केला होता.व त्यांना दि.२९ मार्च २०२३ रोजी जावक पत्र क्रं.ग्रा.प.२/३७७/२०२३ अन्वये अपात्र केले आहे.त्यामुळे तीळवणी येथील अतिक्रमण मुद्दा ऐरणीवर आला आहे.या पूर्वी धोंडेवाडी या ठिकाणी दोन गटांच्या भांडणात गावावर गाढवांचा नांगर फिरवला असल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी हा मुद्दा राज्यभर गजला होता.त्यात आता तिळवणी ग्रामपंचायतीची अधिकची भर पडणार असल्याचे दिसून येत आहे.

गायरान मधील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याच्या नोटिसा तिळवणी ग्रामपंचायतीने बजावल्याचे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी आज कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेकडे धावा बोल केला होता त्याचे छायाचित्र.
दरम्यान याबाबत आता सरपंच गोविंद पगारे यांनी नाशिक येथील आयुक्तांकडे अपील दाखल केले असल्याची माहिती हाती आली आहे तर ग्रामपंचायत निवडणुकीस केवळ एक वर्षे बाकी असल्याने हे सरपंचपद खरोखर जाणार की कायदेशीर कचाट्यात अडकून कालावधी पूर्ण करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.वर्तमानात कारभार उपसरपंच अण्णासाहेब मन्सुख शिंदे यांचेकडे असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान याबाबत वादग्रस्त सरपंच गोविंद पगारे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
दरम्यान या १०० क्रमांकाच्या गायरान क्षेत्रात जवळपास ४८ ग्रामस्थ आतिक्रमण करून राहत असून त्यांना वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाने तीळवणी ग्रामपंचायतीने चार दिवसांपूर्वी नोटिसा काढून त्यांचे अतिक्रमण काढून घेण्यास बजावले आहे.त्यामुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी आज कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेकडे धावा बोल केला होता.मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी हा वरिष्ठ कार्यालयाचा असल्याचे सांगून हात झटकले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे या सर्व ग्रामस्थांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.त्यात महिला आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.