निवडणूक
नामनिर्देशन भरताना सापत्नपणाची वागणूक-…या उमेदवाराचा आरोप ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
लोकसभेची रणधुमाळी जोरदार सुरू आहे.महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना होतोय.त्यात बंडखोर आणि अपक्षांचा भरणा वेगळाच असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या सापत्नपणाचा अनुभव नुकताच आल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष व अपक्ष उमेदवार अभिजित पोटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली असून त्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून मिळवलेला पुरावा सादर केला आहे.त्यामुळे सत्ताधारी वर्गाच्या सापत्नपणाची उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

खा.सदाशिव लोखंडे यांचे नामनिर्देशन भरून झाले असताना त्यांच्या सोबत आलेल्या इतर लोकप्रतिनिधींनी रितसर बाहेर जाणे अपेक्षित असताना त्याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे,अकोले विधानसभा मतदार संघाचे भाजपचे माजी आ.वैभव पिचड आदिसंह असंबंधीत चार जण उपस्थित होते मात्र त्यांना अधिकाऱ्यांनी सांगूनही ते बाहेर गेले नाही याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अभिजित पोटे यांनी तक्रार केली आहे.
वर्तमानात लोकसभेची रणधुमाळी जोरदार सुरू असून महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना जोरात सुरु आहे.त्यात बंडखोर आणि अपक्षांचा भरणा वेगळाच.विशेष म्हणजे इच्छुकांची संख्या प्रत्येक मतदार संघातून मोठी असून,प्रत्येकालाच निवडणूक लढवायचीय आणि जिंकायची असल्याचा निर्धार दिसून येत आहे.मात्र सत्ताधारी गटास एक नियम तर अपक्षास एक नियम याचा दाहक अनुभव एका अपक्ष उमेदवारास आला असून त्यांनी या बाबत तक्रार केली असून न्याय मागितला आहे.त्या अपक्ष उमेदवारांचे नाव आहे अभिजित अशोकराव पोटे असे आहे.

निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली असून निवडणुकीच्या या वातावरणात एक उमेदवार किती अर्ज भरू शकतो,तो किती मतदार संघातून उभा राहू शकतो,त्याला सूचक किती असावेत,उमेदवार किती जणांना बरोबर घेऊन जाऊ शकतो.निवडणूक लढवण्याची पात्रता नेमकी काय,डिपॉझिट किती भरावे आणि किती रुपयांपर्यंत प्रचार खर्च करावा ?अशी सर्व काही नियमावली जाहीर केली असताना त्याचे सर्रास उल्लंघन केले असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
लोकसभेच्या शिमगा सुरु असून त्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे.निवडणुकीच्या या वातावरणात उमेदवारांसाठी माहिती प्रसारित केली असून यात एक उमेदवार किती अर्ज भरू शकतो,तो किती मतदार संघातून उभा राहू शकतो,त्याला सूचक किती असावेत,उमेदवार किती जणांना बरोबर घेऊन जाऊ शकतो.निवडणूक लढवण्याची पात्रता नेमकी काय,डिपॉझिट किती भरावे आणि किती रुपयांपर्यंत प्रचार खर्च करावा ?अशी सर्व काही नियमावली जाहीर केली असून त्यासाठी काटेकोर अंमलबजावणी सुरु असल्याचे दिसून येत आहे.मात्र त्याचा नुकताच अपवाद शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या कार्यालयात अनुभवास पाहायला मिळाला आहे.शिर्डी लोकसभा मतदार संघाचे बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांचे नामनिर्देशन भरून झाले होते.व त्यासाठी आलेले त्यांचे समर्थक आमदार व लोकप्रतिनिधी हजर होते त्यांनी त्या नामनिर्देशन भरल्यानंतर रितसर बाहेर जाणे अपेक्षित होते.मात्र झाले मात्र उलटेच.त्या ठिकाणी लागलीच शेतकरी संघटना पुरस्कृत प्रहार जनशक्तीचे नेवासा तालुक्यातील अपक्ष उमेदवार अभिजित पोटे यांना मध्ये जाण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती.त्यावेळी नियमाच्या बाऊ करून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व अन्य ०४-०५ सहकाऱ्यांना तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी केवळ नामनिर्देशन भरणाऱ्या एकाच उमेदवारास जाता येईल असे सांगून त्यांना बाहेरच अडवले असून त्यांना मध्ये जाण्यास प्रतिबंध केला असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी या प्रतिबंधांनंतर आपल्या सोबत आणलेल्या सहकाऱ्यांना बाहेरच थांबवले व आपले नामनिर्देशन दाखल केले आहे.मात्र ते ज्यावेळी आत शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या कार्यालयातील दालनात गेले त्यावेळी त्या ठिकाणी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे,अकोले विधानसभा मतदार संघाचे भाजपचे माजी आ.वैभव पिचड आदिसंह असंबंधीत चार जण उपस्थित होते.त्यावेळी आपले नामनिर्देशन हजर करण्यास गेलो त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले होते.त्यावेळी त्यांचे समवेत शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर हे हि उपस्थित असल्याचे चलचित्रणात दिसून येत आहे.मात्र त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री येणार असल्याचे बतावणी करून उपस्थित लोकप्रतिनिधींनी जाण्यास नकार दिला आहे.वारंवार त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी आपल्या खुर्च्या सोडल्या नाहीत.त्यामुळे आपल्या गोपनियतेचा भंग झाला असल्याचा आरोप अभिजित पोटे यांनी केला आहे.त्याबाबत यांनी प्रशासनाकडून माहिती मागितली असता त्याचे चलचित्रण व छायाचित्र अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिले असून त्यांनी ते प्रसिद्धीस दिले आहे.त्यामुळे हा भांडाफोड उघड झाला आहे.त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.व सामान्य माणसांना एक न्याय व लोकप्रतिनिधींना एक न्याय असा मामला उघड झाला आहे.त्यामुळे सर्व जण लोकशाही प्रणालीत एकच असल्याचा फुगा फुटला असल्याचे बोलले जात आहे.यावर प्रशासन आता कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.