सामाजिक उपक्रम
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासासह परकीय भाषा शिकण्याची गरज-कुलपती ठाकूर

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपला न्यूनगंड सोडून देवून व आत्मविश्वास जागृत करून आता जपानी,कोरियन,चिनी आदी परकीय भाषा शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे त्यातून त्यांना कोरिया,जपान,चीन,जर्मनी आदी युरोपियन देशात १८ ते ९० लाख रुपयांपर्यंत मोठे आर्थिक पॅकेज मिळू शकत असल्याचे प्रतिपादन संजीवनी अटॉनॉमस विद्यापीठाचे कुलगुरू ए .जी.ठाकूर यांनी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी ‘आत्मा मालीक करिअर अकॅडमी’चे संचालक प्रा.पंकज भोंगळे यांनी जवळके ग्रामपंचायत आणि जनमंगल ग्रामविकास संस्था राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करत आगामी काळात सुरू होत असलेल्या वाचनालयास आपण यू.पी.एस.सी.आणि.एम.पी.एस.सी.ची पुस्तके उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे त्याचा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.
करिअर मार्गदर्शन म्हणजे व्यक्तीला त्यांच्या शिक्षण आणि करिअरच्या मार्गावर योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करते.यात व्यक्तीची आवड,कौशल्ये,क्षमता आणि मूल्ये ओळखणे आणि त्यानुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यास मार्गदर्शन करण्यास मदत करत असते.शिवाय व्यक्तीला योग्य करिअर निवडण्यास मदत करते,ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगले यश मिळण्याची शक्यता वाढते.त्याच बरोबर व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या क्षमता आणि आवडींबद्दल अधिक जाणीव करून देत आत्म-जागरूकता करून देते.करिअर मार्गदर्शन व्यक्तीला नोकरी शोधण्यात आणि योग्य नोकरी मिळवण्यास मदत करते.करिअर मार्गदर्शनामुळे व्यक्तीला त्यांच्या करिअरबद्दल अधिक आत्मविश्वास मिळतो.करिअर मार्गदर्शन व्यक्तीला उच्च शिक्षणामध्ये योग्य विषय आणि क्षेत्र निवडण्यास मदत करते.विविध शैक्षिणक संस्था व मार्गदर्शन केंद्रे ही विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन पुरवतात कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडे असलेल्या १३ दुष्काळी गावातील विद्यार्थ्यांना जवळके ग्रामपंचायत आणि जनमंगल ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी १० वाजता संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था,अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर,येवला येथील जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे एस.एन. डी.अभियांत्रिकी महाविद्यालय,गौतम पॉलिटेकनिक कॉलेज,कोकमठाण येथील आत्मा मालीक करिअर अकॅडमी,कोपरगाव येथील एस.एस.जी.एम.महवियालय,के.जे.सोमैय्या महाविद्यालय,महिला महाविद्यालय आदीं आठ संस्थाच्या सहकार्याने १० वी,१२ वी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान जलसंपदा विभागाचे संगमनेर घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी जल पंधरवड्यानिमित्त शेतकऱ्यांनी व नागरिकांनी भारतभर पाण्याची टंचाई ओळखून पाण्याच्या बचतीची सवय लावण्याचे आवाहन करून पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.त्याचे ग्रामस्थानी कौतुक केले आहे.
सदर प्रसंगी जलसंपदा विभागाचे संगमनेर येथील कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे,आत्मा मालीक करिअर अकादमीचे संचालक प्रा.पंकज भोंगळे,अमृतवाहिनी इंजिनिअरिंग’चे प्रा.गणेश धारणे,प्राचार्य विजय गडाख,एस.एन.डी.इंजिनिअरिंग चे डॉ.यू.एस.अन्सारी,डॉ.पी.पी.रोकडे,प्रा.संदीप येवले,गौतम पॉलिटेकनिक कॉलेजचे प्रा.सागर थोरात,प्रा.गौरव जोशी,एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रा.संजय गायकवाड,के.जे.सोमेय्या महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन रहाणे,महिला महाविद्यालयाचे प्रा.दत्तात्रय सोनवणे,प्रा.पूनम बोठे,प्रा.सुनीता शेळके,शिर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैय्या,पो.हे. कॉ.गोराने आदींसह जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,उपसरपंच डी.के.थोरात,दत्तात्रय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,इंदुबाई नवनाथ शिंदे,वनिता रखमा वाकचौरे,बापूसाहेब थोरात,अशोक शिंदे,निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष सोण्याबापू ऊर्हे सर,संघटक नानासाहेब गाढवे,भाऊसाहेब सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,कौसर सय्यद,उत्तमराव जोंधळे,अप्पासाहेब कोल्हे,रावसाहेब मासाळ,कैलास रहाणे,रामनाथ थोरात मोठ्या संख्येनं विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी जवळके येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयात जपान मध्ये निवड झालेली विद्यार्थीनी कु.गायत्री रामनाथ थोरात हीचा व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय मंथन परीक्षेत मोठे यश मिळवल्यानंतर कुमारी रुत्वी गणेश थोरात,व अदिती प्रकाश थोरात आदींचा सत्कार करताना कुलपती ए.जी.ठाकूर व मान्यवर दिसत आहेत.
त्यावेळी पुढे बोलताना कुलगुरू ठाकूर म्हणाले की,”भारतात शैक्षणिक धोरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.भारत सन-२०४५ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था व महासत्ता म्हणून उदयाला येत आहे.भारतात तरुणाची मोठी संख्या असून त्यांना जागतिक पातळीवर मोठी मागणी आणि संधी आहे.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासह,महिला हक्क चळवळी आणि पर्यावरणीय न्याय यासारख्या शक्तिशाली सामाजिक चळवळींमध्ये तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे इतिहासात साक्षीदार आहे,या सर्व चळवळींनी मानवी जीवनाचा मार्ग बदलला आहे.ट्रेंडनुसार,२०३० पर्यंत,भारतात सर्वात जास्त तरुण कामगार असतील आणि ते २९ वर्षांच्या सरासरी वयासह जगातील सर्वात तरुण देश बनेल.युवा शक्तीची भूमिका वाढत्या प्रमाणात महत्त्वाची बनेल आणि एकत्रितपणे देशाचे भविष्य निश्चित करेल.त्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे हा देश सन -२०४५ पर्यंत जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येईल.भारत हा एक असा देश आहे जो प्रगतीपथावर आहे,त्याचे सामाजिक-आर्थिक आणि राजकीय परिदृश्य एका टोकाच्या टप्प्यावर आहे.देश एका अभूतपूर्व डिजिटल परिवर्तनाचा अनुभव घेत आहे,राजकीय स्थिरता आणि कठोरतेचे फायदे वापरत आहे आणि त्याचबरोबर त्याच्या सामाजिक चलनाचाही फायदा घेत आहे.अर्थव्यवस्थेचे प्रचंड डिजिटलायझेशन होत आहे जे प्रमाण आणि गतीच्या बाबतीत इतर कोणत्याही मुक्त जगातील राष्ट्रांपेक्षा मागे टाकले आहे, हे परिवर्तन भविष्यातील पिढीसाठी एक संधी सादर करत असून या देशातील प्रतिभेची क्षमता उघड करण्यात मानव संसाधन (एच.आर.) व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.भारताची अर्थव्यवस्था परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे,१६२ देशांमधून एकूण ५३२ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक आली आहे.भारत ज्या आत्मविश्वासाचे,विश्वासाचे,नेतृत्वाचे आणि क्षमतेचे प्रतिनिधित्व करतो त्याचे हे एक भक्कम उदाहरण आहे.२०२५ पर्यंत देश ३.५ ट्रिलियन डॉलर्सच्या जी.डी.पी.सह पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज आहे.त्यामुळे येथील तरुणावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.त्यासाठी त्यांनी आगामी काळात चांगले महाविद्यालय निवडणे गरजेचे आहे.त्यासाठी,’संजीवनी एटोनॉमस विद्यापीठ’हा संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेने चांगला आणि धाडसी पर्याय समोर आणला आहे.जिल्ह्यात प्रथम हे धाडस आमचे संस्थाचालक नितीन कोल्हे आणि व्यवस्थापकीय संचालक अमित कोल्हे यांनी दाखवले आहे त्याचा फायदा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील तरुणांना मिळत आहे.परदेशी शिक्षण संस्थांशी आम्ही करार केले त्यावेळी ते मोठे धाडस वाटत होते.पण आज आम्ही आमच्या योग्य मार्गावर असल्याची खात्री झाली असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना मिळत आहे.आम्ही आता परदेशी शिक्षण संस्थाच्या माध्यमातून प्लेसमेंटसाठी परदेशी कंपन्यांना निमंत्रित केले होते.त्यावेळी स्पर्धकांना आमचे ते मोठे धाडस वाटत होते.मात्र आता तेच आमचे अनुकरण करत आहेत.त्यावेळी विद्यार्थ्याना आवाहन करताना ते म्हणाले की,”महाविद्यालय निवडताना तुम्ही त्यांची निव्वळ इमारत पाहू नका तर तेथील संस्थाचालक,शैक्षणिक गुणवत्ता,स्पर्धा परीक्षांना मिळणारा वाव,परिसर,सोयी,मुलींची सुरक्षा आदी गोष्टीवर लक्ष केंद्रित करा निव्वळ वातानुकूलित असण्यावर भाळू नका असे आवाहन करून त्यांनी संस्थेचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी ही संस्था सन-१९८३ साली स्थापन केली आज या ठिकाणी सर्वाधिक शैक्षणिक शाखा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा,कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केलं आहे.त्यामुळे तुम्हाला नक्कीच मोठे पॅकेज उपलब्ध होईल असे सांगितले आहे.संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेने शिक्षण दिलेले विद्यार्थी सर्वाधिक प्लेसमेंट होत असून आज जगभरात सेवा करत असून त्यांना १८ लाख रुपयांपासून ते ९० लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळत असल्याचे सांगितले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास जागृत करून आता परकीय भाषा शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे त्यातून त्यांना कोरिया,जपान,चीन,जर्मनी आदी देशात मोठे आर्थिक पॅकेज मिळू शकत असल्याचे सांगून जवळके ग्रामपंचायत आणि जनमंगल ग्रामविकास संस्थेने दुष्काळी विद्यार्थ्याना सुरू केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले असून त्याचा नक्कीच या भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

यावेळी ‘अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज’चे प्रा.जयेश धारणे,गौतम पॉलिटेकनिक कॉलेज’चे प्रा.सागर थोरात,’आत्मा मालीक करियर अकॅडमी’चे संचालक प्रा.पंकज भोंगळे,येवला येथील एस.एन.डी.चे डॉ.यू.एस.अन्सारी,डॉ.पी.पी.रोकडे,प्रा.संदीप येवले,एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे प्रा.संजय गायकवाड,के.जे.सोमेय्या महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन रहाणे,महिला महाविद्यालयाचे प्रा.दत्तात्रय सोनवणे आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयातील उपलब्ध कोर्सेस त्यांना असलेले भविष्य आणि महाविद्यालयात असलेल्या उपलब्ध सुविधा यांची सखोल माहिती दिली आहे.तर उपस्थितांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी व शिर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैय्या यांनी आपला या पदापर्यंत झालेला विलक्षण शैक्षणिक प्रवास सांगितला आहे.त्यातून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक जनमंगल ग्रामविकास संस्थेचे संस्थापक नानासाहेब जवरे यांनी केले तर सूत्रसंचालन दातत्रय थोरात यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता एस.के.थोरात यांनी मानले आहे.
त्याचा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.