जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव गावठाण वेसींचे काम सुरु करा-…या पक्षाची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्राचीन कोपरगाव शहराचे वैभव असलेली जुन्या गावठाणात प्राचीन वेशीची निविदा निघून वर्षाचा कालखंड उलटला असतानाही अद्यापही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्या विरोधात आज एकत्र येत कोपरगाव शहर राष्ट्रवादीने कोपरगाव नगर परिषदेला निवेदन देऊन आपला निषेध नोंदवला असून सदर काम त्वरित सुरु करावे अशी मागणी केली आहे.

राघोबा दादा यांनी हिंगणी येथे बांधलेला तीन भिंतीचा अर्धवट वाडा.

दरम्यान याबाबत निविदा रक्कम आणि काम पूर्ण करण्याचा कालावधी,संबंधित ठेकेदार आदींची माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही त्यामुळे सदर माहिती वाचकांसाठी प्राप्त झाली नाही.तथापि या कामात शहरातील काही जणांनी अडचणी निर्माण केल्या असल्याची माहिती आहे.त्यामुळे या कामात आडवा येणारा शुक्राचार्य कोण याची चर्चा शहरात उलटसुलट सुरु झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहराला दैत्य गुरु शुक्राचार्यापासून मोठा प्राचीन वारसा आहे.यात भूमीत मोठे संत ऋषी होऊन गेले आहे.याच ठिकाणी देवगुरु पुत्र कच आणि देवयानी यांची प्रेम कहाणी फळाला आली होती.याच ठिकाणी देव-दानव युद्धात राक्षसांना जिवंत करणारी संजीवनी विद्या कचाच्या सहाय्याने देवांचे गुरु ब्रहस्पती यांनी पळवली होती.याच ठिकाणी इंग्रजांशी संधान बांधून देशद्रोह केल्या प्रकरणी आपल्या कर्तृत्वाने अटकेपार मराठेशाहीचा झेंडा फडकवींणारे राघोबा दादा यांना नाना फडणवीसांसह बारभाईंनी पुण्याच्या बाहेर पाठवून कोपरगावात वर्षाला पंचवीस लाखांची खंडणी (दंड) कबूल करून पाठवले होते.याच ठिकाणी गोदावरी परिक्रमेत पुणतांब्यानंतर कोपरगाव येथील बेटात त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताबाई,संत सोपान काका आदींनी महिनाभर मुक्काम ठोकला होता.या तालुक्यात बकुळा आणि लोकशाहीर परशराम यांची प्रेमकहाणी फुलली आणि फळली होती.संत जनार्दन स्वामी,संत रामदासी महाराज आदींनी याच ठिकाणी आपले ईहलोकीचे कार्य पार पाडले होते.पेशवाईतील शेवटचा तथा दुसरा बाजीराव यांचे लहानपण येथील वाड्यात गेले होते.इतके प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असलेला हा परिसर असताना या ठिकाणी प्राचीन वारसा जपण्याची खरे तर पालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.मात्र या पातळीवर दुष्काळ असल्याचे जाणवते.तसे नसते तर कोपरगाव येथील जुन्या गावठाणातील प्राचीन वेस अद्याप निविदा निघूनही का पूर्ण केली जात नाही असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.त्यासाठी वाचा फोडण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादीचे शहरातील कार्यकर्ते यांनी पालिकेवर मोर्चा काढून आपल्या भावना मोकळ्या करून दिल्या आहेत.

त्यात त्यांनी म्हटलं आहे की.”प्राचीन वेशीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून हा ऐत्याहसिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्यासाठी पालिकेने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या कालखंडात ठराव करून सदर कामाची निविदा काढली होती.त्याला सर्वपक्षीय नगरसेवक यांनी पाठींबा दिला होता.त्या प्रकरणी प्रशासकीय सोपस्कार करून निविदा काढण्यात आली होती.त्यानुसार ते निर्धारित वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते.मात्र तिकडं कोणीही लक्ष दिले नाही हे विशेष ! आता नगरपरिषदेच्या निवडणूक तोंडावर आल्या असताना त्याला गती देणे गरजेचे आहे.(कारण आता मते मिळविण्यासाठी तो महत्वाचा दुवा ठरू शकतो) त्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला असून आज त्यासाठी पालिकेवर प्रमुख माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी लक्षवेध केला आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक मंदार पहाडे,रमेश गवळी,कृष्णा आढाव,राजेंद्र वाघचौरे,विलास आव्हाड,सुरेंद्र सोनटक्के,संदीप सावतडकर,धनंजय कहार,बाळासाहेब रुईकर,बाला गंगूले,राहुल देवळालीकर,चांदभाई पठाण,गणेश लकारे,शिवा लकारे,वाल्मिक अहिरे, ऋषिकेश खैरनार,मुकुंद भुतडा,समर्थ दीक्षित,अमोल देवकर,फकीर कुरेशी,निटीन शिंदे,आकाश डागा आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close