जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ट्रॅक्टरसाठी महिलेचा छळ, कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ट्रॅक्टरसाठी माहेरवरून दोन लाख रुपये व तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने आणावे यासाठी आपला बेलगाव ता.वैजापूर येथील आपले पती सचिन मच्छीन्द्र पवार,सासू मंगलबाई मच्छीन्द्र पवार,सासरे मच्छीन्द्र मुरलीधर पवार,नणंद मनीषा मच्छीन्द्र पवार आदी चौघांनी शारीरिक मानसिक छळ करून शिवीगाळ व मारहाण करून उपाशी पोटी ठेऊन घराच्या बाहेर काढून दिले असल्याचा गुन्हा फिर्यादी माहिला अश्विनी सचिन पवार (वय-२२) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिल्याने कोपरगाव,वैजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सन-१९८६ मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम ४९८(अ) या कलमाची तरतूद करण्यात आली.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.कोपरगाव तालुका पोलिसांनी तो नुकताच दाखल केला आहे.

भारतात प्रत्येक समाजामध्ये हुंड्याची प्रथा प्रचलित आहे.विवाहसंस्थेत गुंतलेल्या व भवतालच्या असंख्य लोकांच्या आयुष्यांवर ही प्रथा अनिष्ट परिणाम करत आहे.जेव्हा एखाद्या घराण्याच्या राजकन्येचे लग्न होत असे तेव्हा राजा अत्यानंदाच्या भरात त्याच्या संपत्तीचा व राज्याचा काही भाग जावयाला एका भव्य सोहळ्यामध्ये प्रदान करत असे.त्याचे मंत्रीही या राजेशाही प्रथेचे पालन एक शिष्टाचार म्हणून करू लागले.मग राजाची सामान्य प्रजा,मग ती गरीब असो किंवा श्रीमंत,या दिखाऊ प्रथेचे पालन ‘प्रतिष्ठा’ जपण्यासाठी करू लागली आणि त्यांनाही आपण राजेशाही असल्याचा आभास यातून होऊ लागला.आज सामान्य माणसेही या अनिष्ठ प्रथेचा अवलंब करीत असून मुलीच्या वडिलांना हा फास आता आणखी वेढू लागला आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव माहेर व नजीकच वैजापूर तालुक्यात बेलगाव सासर असलेल्या नवविवाहितेच्या वाट्याला आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिलेचे दि.१४ मे २०२० रोजी लग्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सदर नवविविहितेला सासरची मंडळी त्रास देऊ लागली होती.त्यांनी अगोदर ट्रॅक्टरसाठी माहेरवरून दोन लाख रुपये व तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने आणावे यासाठी आपला बेलगाव ता.वैजापूर येथील आपले पती सचिन मच्छीन्द्र पवार,सासू मंगलबाई मच्छीन्द्र पवार,सासरे मच्छीन्द्र पवार,नणंद मनीषा मच्छीन्द्र पवार आदी चौघांनी शारीरिक मानसिक छळ करून शिवीगाळ व मारहाण करून उपाशी पोटी ठेऊन घराच्या बाहेर काढून दिले असल्याचा गुन्हा फिर्यादी माहिला अश्विनी सचिन पवार हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिल्याने कोपरगाव,वैजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

सन-१९८६ मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम ४९८(अ) या कलमाची तरतूद करण्यात आली.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.कोपरगाव तालुका पोलिसांनी तो नुकताच दाखल केला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी महिलेचा गुन्हा क्रं.६७/२०२२भा.द.वि.कलम ४९८(अ) ३२३,५०४,५०६,प्रमाणे चारही आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसानी दाखल करून घेतला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र म्हंस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close