जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्वत:च्या फायद्यासाठी ते क्रीडा संकुल सैनिकी शाळेजवळ पळविले-कोपरगावात आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

ज्यांनी २००२-०३ साली कोपरगाव शहरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी गांधीनगर भागातील इनडोर गेम हॉलमध्ये मंजूर झालेले क्रीडा संकुल स्वत:च्या फायद्यासाठी ते क्रीडा संकुल आपल्या सैनिकी शाळेजवळ पळविले त्यांनीच दुसऱ्यावर आरोप करणे म्हणजे स्वत:चे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका माहेगाव देशमुखचे उपसरपंच विकास रणशिंग यांनी केली आहे.

“माहेगाव देशमुखला मंजूर करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व नियमांच्या निकषात बसल्यामुळे मंजूर झाले आहे.तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कोणी अडविले होते.तुम्ही शिंगणापूरच काय,पण पाहिजे त्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करूण आणू शकत होता कारण राज्यात व केंद्रात तुमच्या पक्षाचे सरकार होते.मात्र केंद्रात व राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून उपयोग नाही”-आरोप

शिंगणापूरच्या सरपंच पतींनी आपल्या अकार्यक्षम नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे अपयश झाकण्यासाठी शिंगणापूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र माहेगाव देशमुखला पळविल्याचा बिनबुडाचा आरोप ना.आशुतोष काळे यांच्यावर केला आहे.त्या आरोपाचा उपसरपंच विकास रणशिंग यांनी त्यावर टीका केली आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”मागील पाच वर्षात राज्यापासून केंद्रापर्यंत स्वत:च्या पक्षाचे सरकार असतांना जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मागील दोनच वर्षात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.काळे यांनी करून दाखविल्याचा दावा केला आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावाला त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात समावून घेतल्यामुळे प्रत्येक गावात रस्ते,वीज,पाणी,आरोग्य आदी विकासकामे सूरु आहेत हे जनतेला माहिती आहे.मात्र ज्यांना सध्या काहीच काम नाही,ज्यांच्याकडे होत असलेला विकास पाहण्याची मानसिकता नाही त्यांच्याकडून सध्या बिनबुडाचे आरोप करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे.
माहेगाव देशमुखला मंजूर करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व नियमांच्या निकषात बसल्यामुळे मंजूर झाले आहे.तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कोणी अडविले होते.तुम्ही शिंगणापूरच काय,पण पाहिजे त्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करूण आणू शकत होता कारण राज्यात व केंद्रात तुमच्या पक्षाचे सरकार होते.मात्र केंद्रात व राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून उपयोग नाही त्यासाठी पाठपुरावा देखील तेवढाच महत्वाचा आहे.मागील पाच वर्ष माजी आमदारांनी फक्त निवेदन देवून,फोटोसेशन करण्यात घालविले.मात्र याउलट ना. काळे यांनी निवडून आल्यापासून मतदार संघाच्या विकासाचा अभ्यास करून शासनदरबारी अनेक विकासकामांचे प्रस्ताव सादर करून प्रत्येक प्रस्तावांचा पाठपुरावा करून निधी मिळवीत आहे याचे खरे विरोधकांना दु:ख असल्याचा दावा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close