गुन्हे विषयक
नवविवाहित महिलेचा विहिरीत मृतदेह,आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2021/06/images-2021-05-29T203253.663-691x405.jpeg)
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील रहिवासी विवाहिता पूजा सागर मापारी (वय २१) हिचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून पूजा हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हुंडा बळीचा गुन्हा विवाहितेचा पती सागर मापारी,सासू संगीता मापारी,सासरे भीमराज मापारी,दिर विशाल मापारी असा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तालुका पोलिसांनी काल अटक केली होती त्यांना आज कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण न्यायालयाने त्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सहा महिन्यांपूर्वी पढेगाव येथील सागर मापारी याच्याशी मुलगी पूजा हिचा विवाह झाला होता.विवाह झाल्या नंतर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर तिच्या सासरच्या व्यक्तींनी माहेरवरून फर्निचर दुकान टाकण्यासाठी दोन लाख रुपये माहेरवरून तिचा आणण्यासाठी शारीरिक,मानसिक छळ करून शिवीगाळ करत होते त्यातून हि घटना घडल्याचे मुलीचा पिता विजय भुजाडे यांनी म्हटले होते.नवरा,सासू,सासरे,दीर अशा चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की,विवाहित पुजाचे वडील विजय बाळकृष्ण भुजाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हणते आहे की,सहा महिन्यांपूर्वी पढेगाव येथील सागर मापारी याच्याशी मुलगी पूजा हिचा विवाह झाला होता.विवाह झाल्या नंतर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर तिच्या सासरच्या व्यक्तींनी माहेरवरून फर्निचर दुकान टाकण्यासाठी दोन लाख रुपये माहेरवरून तिचा आणण्यासाठी शारीरिक,मानसिक छळ करून शिवीगाळ करत होते.व तिचा शारीरीक व मानसीक त्रास दिला तसेच आडुन पाडुन बोलुन शिवीगाळ, दमदाटी व मारहान करुन पुजाची हुंड्यासाठी छळवणुक केली तसेच तिचा पती सागर भिमराज मापारी याने विवाहबाह्य संबंध ठेवुन मयताचा मानसीक छळ केला म्हणुन गुन्हा पुजा हिचा नवरा सागर भिमराज मापारी,सासरा भिमराज लक्ष्मण मापारी,सासु संगिता भिमराज मापारी व दिर विशाल भिमराज मापारी असा चौघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.क्रं. व कलम १९६/२०२१ कलम ३०४(ब),४९८,(अ),३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी अटक करून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले होते.या घटनेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.