जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रुग्णवाढीला मोठा उतार तरी बळी सुरूच

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात नगर येथे ४०७ श्राव तपासणीसाठी पाठवले असून ५३१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ४९ बाधित तर ४८२ निरंक आले आहे.आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ००,अँटीजन तपासणीत ४९,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत १९ असे एकूण अहवालात एकूण ६८ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ८९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहरात एक पुरुष वय-५५ यांचे निधन झाले आहे तर तालुक्याच्या ग्रामीण एकाचा मृत्यू नोंदवला गेला नाही ही समाधानाची बाब आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार ३२६ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ८३८ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १७८ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५७ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ५० हजार ७९० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख ०३ हजार १६० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २२.३० टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १० हजार ३१० रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९१.०३ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख २७ हजार ७२१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १९ हजार ७४५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ०५ हजार ४८५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ४९० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या रोडावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.ताळेबंदीचा इष्ट परिणाम आता स्पष्ट दिसू लागला आहे.

उद्या दिनांक २० मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन(covaxin) लसीचा दुसरा डोस ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी तसेच शासकीय कर्मचारी(FLW) यांसाठी ठेवण्यात आला आहे, सदर सत्रामध्ये लस द्यावयाच्या लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मार्फत फोन करण्यात आला आहे ज्या लोकांना फोन आला असेल त्यांनीच फक्त जी वेळ दिली असेल त्यावेळेसच आपल्या आधार कार्ड व पहिल्या डोस चे प्रमाणपत्र सह उपस्थित रहावे इतर कोणीही गर्दी करू नये अथवा चौकशीसाठी येऊ नये, जसजशी लस उपलब्ध होईल त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना ( sjs, आत्मा मलिक हॉस्पिटल व ग्रामीण रूग्णालय येथे लस घेतलेले ) लसीकरणासाठी बोलावले जाईल तरी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे केलेल्या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close