कोपरगाव तालुका
कोपरगावात अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे लोकार्पण कधी ?
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2021/12/IMG_20211228_140913-780x405.jpg)
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतातच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पंधरा वर्षापासून वादग्रस्त ठरलेला पूर्णाकृती पुतळ्याचे तब्बल दहा-बारा वर्ष शिल्पकाराच्या गॊदामामध्ये पडून राहिल्यानंतर कोपरगावात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले असले तरी अद्याप या पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रम संपन्न झालेला नाही त्यात या पुतळ्याच्या स्रेय वादावरून मोठे राजकारण घडले असताना आता लोकार्पणासाठी मुहूर्त लाभेल का ? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहे.
“आपण हा पुतळा आणायचे जाहीर केले होते.त्या प्रमाणे आपण हा पुतळा अनंत अडचणी असताना आपली प्रतिष्ठा पणाला लावत आणला आहे.आता लोकार्पण कधी करायचे हा प्रश्न त्यावरील पुर्णाकृती पुतळा स्मारक समितीने घावयाचा आहे.आपल्याला कोनशिला लावण्यात रस नाही व गत पाच वर्षात आपण असा अश्लाघ्य प्रयत्न कधीही केला नाही”-विजय वहाडणे,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद
तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारसरणीचे होते.त्यांच्या पुतळ्याच्या आणण्यावरून कोपरगावात अनेक वादंग झाले त्यामुळे अनेक वेळा या पुतळा वाहनात ठेऊन त्याचा निर्णय बदलावा लागला होता.मात्र कोपरगाव शहरात केवळ श्रेयवादावरून या पुतळ्याचे गेली अनेक वर्षे अनावरण टाळले जात होते मात्र आता त्याला रविवार दि.२६ डिसेंबर रोजी अकरा वाजता मुहूर्त लाभला होता.
“सदरचा पुतळा बऱ्याच दिवसापासून शिल्पकाराच्या गोदामात बंदिस्त होता.आता कोपरगावात आणला आहे तर पुतळा स्मारक समितीने लवकरात लवकर लोकार्पण करावा”-विरेन बोरावके,विरोधी गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस.
भंडाऱ्याची उधळण करत फटक्यांची आतषबाजी करत आ.आशुतोष काळे,माजी आ.कोल्हे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव थोरात,अड.नितीन पोळ,विनोद राक्षे,शरद त्रिभुवन व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले होते.त्याच दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण होईल असे वाटतं असताना त्या दिवशी केवळ सदरचा पुतळा क्रेनच्या सहाय्याने प्रस्तावित चबुतऱ्यांवर ठेवण्यात आला मात्र त्याचे अनावरण का टाळले हे समजायला मार्ग नाही.त्यामुळे आता या पूतळ्याचे लोकार्पण कधी होणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.त्या बाबत विविध तर्ककुतर्कांना उधाण आले आहे.त्यामुळे याबाबत आमच्या प्रतिनिधीने विविध मान्यवरांना याबाबत बोलते केले आहे.
या बाबत भाजप कोल्हे गटाचे नेते रवींद्र पाठक यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वादग्रस्त विषयावर मत व्यक्त करणे टाळले असून गत पाच वर्ष नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी,सर्व नगरसेवक आदींनी चांगले काम केले आहे.या सर्व पदाधिकारी,नगरसेवकांचा शेवट गोड व्हावा अशी ईच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान या पुर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव जाधव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सविस्तर मत व्यक्त करणे टाळले असून ,”आपण याबाबत सर्वांचे एकमत करण्यावर भर देत असून लोकार्पण करण्याबाबत लवकरच एकमत होईल” असा विश्वास व्यक्त केला आहे.