जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पंडित दीनदयाळ या थोर नेत्याचे नाव देणे हे आमचे भाग्य-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता.भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.त्यांनी त्यावेळी मोठे सामाजिक कार्य केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे नाव आपल्या कालखंडात नगरपरिषदेच्या अग्निशामक इमारतीला देण्यात येत आहे हि भाग्याची गोष्ट असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता.भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.पंडित दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले.साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचे निमित्ताने कोपरगाव नगरपरिषदेने आज आपल्या अग्निशामक केंद्रास त्यांचे नामकरण कार्यक्रम त्याच केंद्रात तब्बल पस्तीस वर्ष सेवा बजावलेले सेवानिवृत्त जेष्ठ कर्मचारी यादव लोट यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते रामदास खैरे,नगरपरिषदेच्या सभापती ताराबाई जपे,सौ.सोनवणे,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,प्रमोद पाटील,छन्नोदास वैष्णव,विवेक सोनवणे,किरण थोरात,कैलास सिनगर आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म मथुरा येथे २५ सप्टेंबर रोजी झाला होता.तर मृत्यू दि.११ फेब्रुवारी इ.स. १९६८ मुघलसराय येथे रेल्वे स्थानकाजवळ झाला होता.ते भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता.भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.पंडित दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले.साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.शास्त्रे,धर्मग्रंथ आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्म मानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली.मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते.आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे.ते कोपरगावातही तत्कालीन भाजप नेते सूर्यभान वहाडणे यांचेकडे येत असत.त्यांचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.त्यांची तत्कालीन जनसंघाच्या विचार सरणीवर मोठी निष्ठा होती.त्यांचे नाव कोपारगावात नगरपरिषदेच्या वास्तूला देणें हे आमचे भाग्य समजतो असेही ते शेवटी म्हणाले आहे.

सदर प्रसंगी छन्नुदास वैष्णव यांनी त्यांच्या व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांच्या अनेक आठवणी जाग्या केल्या आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.सुभाष शिंदे यांनी केले तर उपस्थितांना उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,गटनेते रवींद्र पाठक यांनी मार्गदर्शन केले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चेतन खुबाणी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विनायक गायकवाड यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close