जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात अनेकांची विलगीकरण कक्षात रवानगी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील ओमनगर येथील दोन व कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत आढळलेल्या एक अशा एकूण तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वीस जणांना तालुका आरोग्य विभागाने कोपरगाव कोरोना केंद्रात विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.व त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले आहे.आता या संशयितांचे अहवाल नेमके कसे येतात याकडे तालुक्यातील नागिरिकांचे लक्ष लागून आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांनी मुंबई,पुणे,औरंगाबाद,नाशिक या ठिकाणावरून आलेल्या लोकांना गावांमध्ये घेऊ नका किंवा घेतल्यास त्यांना शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी सांगितलेले आहे त्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवावे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना गावाकडे बोलावू नये.पुढील काही दिवस अत्यंत धोक्याचे असून आपणही बाहेरगावी जाण्याचे टाळावे आणि आपल्या पाहुण्यांना सुद्धा आपल्या गावांमध्ये न येण्यासाठी सूचित करावे-तहसीलदार चंद्रे

सदरचे सविस्तर वृत्त असेल की,कोपरगाव शहरात वर्तमानात कोणताही रुग्ण नसताना आता मंगळवार दि.१ जुलै रोजी धक्कादायक घटना उघड झाली असून कोपरगाव शहरातील खडकी रस्ता मार्गावर असलेल्या ओमनगर परिसरात असलेल्या एका खाजगी डॉक्टरला (वय-४५) व त्यांच्या वडिलांना (वय-७२) या दोघाना कोरोना विषाणूची बाधा झाली असून या खेरीज कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याला (वय-४६) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती. या तीनही कोरोना बाधित रुग्णांना तातडीने कोपरगाव कोरोना केंद्रात हलविण्यात आले असून हा परिसर तालुका प्रशासनाने प्रतिबंधित केला होता व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांचा शोध सुरु केला होता.त्यात ओमनगर परिसरातील दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ११ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.या खेरीज टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या मात्र मुंबई येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात नऊ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.त्यांना तातडीने ताब्यात घेतले आहे.व कोपरगाव येथील कोरोना केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली असून त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तातडीने पाठवले आहे.आता तालुका व शहरातील नागरिकाचे या अहवालाकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांनी मुंबई,पुणे,औरंगाबाद,नाशिक या ठिकाणावरून आलेल्या लोकांना गावांमध्ये घेऊ नका किंवा घेतल्यास त्यांना शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी सांगितलेले आहे त्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवावे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना गावाकडे बोलावू नये.पुढील काही दिवस अत्यंत धोक्याचे असून आपणही बाहेरगावी जाण्याचे टाळावे आणि आपल्या पाहुण्यांना सुद्धा आपल्या गावांमध्ये न येण्यासाठी सूचित करावे.वर्तमान परिस्थितीमध्ये कोव्हिड-१९ या विषाणुचा प्रसार हा बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे किंवा आपल्याकडचे लोक जे बाहेर गावी जाऊन येतात त्यांच्यामुळे होताना दिसत आहेत.त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी जबाबदार नागरिक असल्यासारखे वागून एक तर बाहेर जाऊ नये किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांना आपल्याकडे बोलावून नये.आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हि जबाबदारी अतिशय महत्त्वाची आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून आपण आपले कुटुंब आपले गाव आणि आपला तालुका करोना मुक्त कसा राहील त्याच्या अनुषंगाने प्रयत्न करायचा आहे.नागरिकांनी आपल्या घरी राहावे व सुरक्षित राहावे आणि सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close