शैक्षणिक
एम.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी बनवले सोलर कल्टिव्हेटर

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रामुख्याने भेडसावणारा मजुरांवर व ट्रॅक्टर व शेती अवजारांवर होणारा खर्च टाळण्यासाठी येवला येथील मातोश्री पॉलिटेक्निक कॉलेज येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिकणारे आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थी चंद्रकांत टोपले,उमेश महाले,मनोज गावित,खुशाली गावित आदींनी सौरऊर्जेच्या मदतीने शेतीसाठी आवश्यक असलेली कोळपणी आणि कल्टिवेटर करण्यासाठी सौर कल्टिव्हेटर बनवले असल्याची माहिती महाविद्यालयाने दिली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होता आहे.

“डिप्लोमा शिक्षणानंतर विद्यार्थ्याने स्वतःचा व्यवसाय उभा करावा या उद्देशाने विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण दिले जाते व अंतिम वर्षात प्रोजेक्ट तयार करून घेतले जातात.कृषी क्षेत्राशी निगडीत तयार केलेले उपकरण नक्कीच शेतकऱ्याना उपयुक्त ठरेल”-डॉ गीतेश गुजराथी,प्राचार्य,मातोश्री पॉलिटेक्निक,येवला.
शेतीचा आर्थिक विकास आणि ऊर्जेचा वापर घनिष्ठ संबंध आहे.देशाला लागणारा २२ ते २४ दशलक्ष पेट्रोलियम पदार्थ,७० ते ७२ दशलक्ष कोळसा आणि ८४,४०० दशलक्ष किलोवॉट अवर या देशाच्या आर्थिक विकासाच्या कणा शेतीच्या वाट्याला फक्त १२ ते १४ टक्के ऊर्जा येते आहे.शेतीसाठी आवश्यक यादी ऊर्जेची गरज,मनुष्य आणि प्राणी बळ, कोळसा,लाकूड,पालापाचोळा,शेण अशा ऊर्जा स्रोत उपलब्ध होते.त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होत आहे.परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.त्यामुळे सौर ऊर्जा सर्वात स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर भारतात उपलब्ध असणारा पर्याय न ठरला तर नवल.त्यातून शेतकऱ्यांची मोठी बचत होणार आहे.ही गरज ओळखून येवला येथील ‘मातोश्री पॉलिटेक्निक कॉलेज’च्या विद्यार्थ्यानी सौर ऊर्जेवरील कोळपणी आणि कल्टिव्हेटर सयंत्र निर्माण केले आहे.

”आपण येवला येथील मातोश्री पॉलिटेक्निक येथे शिष्यवृत्ती योजनेतून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे मोफत शिक्षण घेतले.अंतिम वर्षात माझ्या शिक्षकांच्या माध्यमातून मी प्रोजेक्ट केला जो यशस्वी झाला व त्याचे उत्पादन करून आपण बाजारात विकणार आहे त्यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळनार आहे”-चंद्रकांत टोपले,रा.सुरगाणा येथील विद्यार्थी.
या यंत्रासाठी विद्यार्थ्यांना फक्त ०८ हजार रुपये एवढा खर्च आला आहे.या सौर कल्टिवेटरमध्ये सौर पॅनल्सचा वापर करून इलेक्ट्रिक मोटरने हे चालवून शेतीची आवश्यक असलेली कोळपणी आणि कल्टीवेटर करण्याचे काम करते आहे.त्यामुळे डिझेल किंवा पेट्रोलसारख्या पारंपरिक इंधनांचा वापर कमी होतो आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होत आहे.हे यंत्र मका,बाजरी,कपाशी,टॉमेटो या पिकांसाठी शेतकरी वापरू शकतो.या सोलर यंत्राचा वापर करून शेतकरी दोन ते अडीच तासांमध्ये एक एकर शेताची कुठल्याही खर्चाविना कोळपणी करू शकतो.सदर प्रोजेक्ट करिता महाविद्यालयाचे प्राचार्य गीतेश गुजराथी,विभागप्रमुख योगेश खैरनार,विलास गुजर,अभिजित जगताप यांचे मार्गदर्शन लाभले होते.