गुन्हे विषयक
अवैध गोवंश वाहतूक,पाच जणांवर गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही कोपरगाव शहरानजीक असलेल्या येवला रोडवर आज सकाळी १० वाजता येवल्याकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी विनोद रवींद्र माईंनकर,गोरख कदम चव्हाण आदीसह पाच जणांविरुद्ध अवैध गोवंश वाहतूक केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मयूर माणिक विधाते (वय-२९) रा.दत्तनगर कोपरगाव यांनी गुन्हा दाखल केला असल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान यात घड्याळ मस्जिद धुळे येथील आरोपी मयूर विधाते,संभाजीनगर येथील आरोपी गोरख कदम चव्हाण,बिलदरी नागद,सायगव्हान,तालुका कन्नड येथील आरोपी सुनील गणेश चव्हाण,त्याच ठिकाणचा आरोपी उमेश हेमा राठोड आदीं विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात मार्च २०१५ पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा,१९९५ लागू करण्यात आला आहे.सुधारित अधिनियमांप्रमाणे गायीची,वळूची बैलाची कत्तल करण्यास मनाई आहे.गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गायी,वळू बैल यांच्या कत्तलीस मनाई आहे.तसेच राज्यात गायी,वळू बैलांच्या कत्तलीच्या प्रयोजनासाठी वाहतूक,निर्यात,खरेदी,विक्री तसेच गोवंशाचे मांस बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय राज्याच्या बाहेरील कत्तल केलेल्या गायी,वळू,बैल यांचे मांस बाळगण्यास देखील मनाई करण्यात आलेली आहे.जिल्ह्यांतर्गत होणाऱ्या वाहतुकीवर पोलिस विभाग तसेच परिवहन विभागाने करडी नजर ठेवून अवैध वाहतूक होणार नाही,यासाठी सदैव तत्पर राहावे,अशा सूचना दिल्या गेल्या असतानाही कोपरगावसह राज्यात गोवंश हत्या राजरोस होताना दिसत आहे.त्यातले त्यात कोपरगाव शहर यासाठी गुजरात पर्यंत कुप्रसिद्ध आहे.त्यातून बऱ्याच वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत.सन-२०१७ साली ऐन शिवरात्रीच्या दिवशी मोठी गोवंश कत्तल नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी साध्या वेशात येवून त्याची रेकी करून मोठी कारवाई केली होती.त्यामुळे कोपरगाव शहर आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.याबाबत सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज यांनी गोदावरी नदीत रक्ताचे पाट वाहत असल्याप्रकरणी व पवित्र नदी दूषित करीत असल्याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यामुळे मोठे वादळ उठले होते.आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली असून सकाळी १० वाजेच्या सुमारास अशीच बेकायदा गोवंश वाहतूक करण्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत कोपरगाव येथील गोरक्षक मयुर विधाते यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यात त्यांनी म्हंटले आहे की,”राज्यात गोवंश हत्या करण्यास बंदी असतानाही कोपरगाव शहराच्या नाजीक असलेल्या येवला नाका या ठिकाणी एक आयशर कंपनीचा टेम्पो (क्रं.एम.एच.१८ बी.जी.४४८९) हा गोवंश जातीची जनावरे घेऊन व दाटीवाटीने त्यांना अन्न पाणी न देता बेकायदा घेऊन जाताना आढळून आला आहे.त्यात ४० हजार रुपये किमतीच्या चार गायी,१० हजार रुपये किमतीची दोन वासरे,१५ हजार रुपये किमतीची काळे रंगाची दोन वासरे,०५ हजार रुपये किमतीचे एक तांबड्या रंगाचे वासरू,२० हजार रुपये किमतीचा तांबड्या रंगाचा शिंगे असलेला एक बैल,०२ लाख रुपये किमतीचे दहा सफेद रंगाचे बैल,प्रत्येकाची किंमत प्रत्येकी २० हजार या शिवाय ०३ लाख रुपये किमतीचा एक आयशर कंपनीचा वरील क्रमांकाचा टेम्पो असा एकूण ०५ लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान यात घड्याळ मस्जिद धुळे येथील आरोपी मयूर विधाते,संभाजीनगर येथील आरोपी गोरख कदम चव्हाण,बिलदरी नागद,सायगव्हान,तालुका कन्नड येथील आरोपी सुनील गणेश चव्हाण,त्याच ठिकाणचा आरोपी उमेश हेमा राठोड आदीं विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या ठिकाणी घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२५२/२०२५ प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०,३,११(घ)प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हांडोरे हे करीत आहेत.