निधन वार्ता
पत्रकार रासकर यांचे निधन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जुन्या पिठीतील ज्येष्ठ पत्रकार सुरेश दगडोबा रासकर (वय-७६) यांचे आज निधन आले आहे.त्यांचेवर आज सायंकाळी ७.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करणेत आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.सुरेश रासकर यांनी शून्यातून आपले शब्दवैभव मिळवले होते.शहराच्या दर्शनी भागात स्वतःचे कार्यालयात स्थापन केले होते.त्याकाळी सुरेश रासकर आणि सार्वमत हे अभेद्य समीकरण उदयाला आले होते.त्यांनी नंतर गावकरी,लोकमत,सामना,केसरी,आदी वर्तमान पत्रात निरंतर लेखन करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती.नेत्यांना जाब विचारायला ते मागेपुढे पाहत नसत.
स्व.सुरेश रासकर यांनी ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती.त्याकाळी शंकरराव काळे आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे खा.बाळासाहेब विखे आदींची तालुक्यात आणि जिल्ह्यात चलती होती.त्याकाळात समाजमाध्यम नसल्याने नागरिकांना आणि वाचकांना केवळ वर्तमानपत्रावर अवलंबून राहावे लागत होते.राजकीय नेतेही त्याला अपवाद नव्हते.परिणामी साप्ताहिकाचा काळ जाऊन वर्तमानपत्रे चांगलीच स्थिरावली होती.त्या काळी श्रीरामपूर येथून एक तरुण कोपरगाव या ठिकाणी येतून वर्तमानपत्रात स्थिरावला होता.शून्यातून त्यांनी आपले शब्दवैभव मिळवले होते.शहराच्या दर्शनी भागात स्वतःचे कार्यालयात स्थापन केले होते.त्याकाळी सुरेश रासकर आणि सार्वमत हे अभेद्य समीकरण उदयाला आले होते.त्यांनी नंतर गावकरी,लोकमत,सामना,केसरी,आदी वर्तमान पत्रात निरंतर लेखन करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती.नेत्यांना जाब विचारायला ते मागेपुढे पाहत नसत.बऱ्याच वेळा नेते आपल्या बातम्या त्यांच्या लेखणीतून प्रसिध्दी व्ह्याव्या अशी इच्छा धरून त्यांच्या घरी आणि कार्यालयात ठाण मांडत असत.तो वर्तमानपत्राचा सुवर्ण काळ होता असे म्हटले तर वावगे ठरू नये.त्या काळी स.म.कुलकर्णी,सी.बी.गंगवाल,सकाळचे भास्कर जोशी,अशोक खांबेकर,आदी पत्रकारितेत नावाजली गेलेली नावे होती.त्यांनी तालुक्यातील शेती प्रश्न,पाणी प्रश्न,विविध समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला होता.शिर्डीत त्यावेळी स्वतंत्र पत्रकार नव्हते.त्याकाळी ही मांडली शिर्डीत मोठा नेता,अभिनेता आला की त्या ठिकाणी धाव घेऊन त्या बातम्या कव्हर करत असतं.परिणामी राज्यव्यापी त्याला प्रसिध्दी मिळत असत.आता जुन्या पिढीतील पत्रकारितेतील दुवा निखळला आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदर अंत्यविधीसाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे आदींसह बहुसंख्येने नागरिक,पत्रकार उपस्थित होते.