जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

डॉ.पंजाबराव देशमुखांमुळे देशात कृषीक्रांती-..यांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   “स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाची सोय नसल्याकारणाने तत्कालीन शेतकरी अज्ञान, अंधश्रद्धा व रुढी परंपरेच्या गाळात रुतलेला होता अशा प्रतिकूल काळात डॉ.पंजाबराव देशमुखांसारख्या विदर्भातील भूमिपुत्राने केलेल्या क्रांतिकारी कार्यामुळे कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन देशात मोठी कृषी क्रांती होऊ शकली असल्याचे प्रतिपादन प्रा.विशाल नंदागवळी यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

प्रा.विशाल नंदागवळी बोलतानाचा क्षण.

  

“डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची ओळख करून देताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व कोपरगावचे माजी आमदार कै.के.बी.रोहमारे आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांचे ऋणानुबंध होते,म्हणूनच के.बी.रोहमारे यांनी त्यांना आमंत्रित केले होते”-डॉ.विजय ठाणगे,प्राचार्य, के.जे.सोमय्या महाविद्यालय,कोपरगाव.

  कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या वतीने ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रसंगिकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे होते.

  सदर प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे म्हणाले की,”डॉ.पंजाबराव देशमुख यांनी अत्यंत विषम परिस्थितीत प्रचंड संघर्ष करून परदेशात जाऊन मोठमोठ्या पदव्या प्राप्त संपादित केल्या व पुढे स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री झाल्यानंतर शेतकरी, शेतमजूर तसेच उपेक्षित-वंचितांसाठी अखेरपर्यंत समर्पित भावनेने कार्य केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात देखील मोठे कार्य केले.महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री शिवाजी सारखी अग्रगण्य शिक्षण संस्था तसेच श्रद्धानंद छात्रालय स्थापना केली त्याचबरोबर अस्पृश्यांना अंबाबाई मंदिर खुले करणे, वंचितांसाठी तलाव,विहिरी,पानवठे निर्माण करणे यासारखे मोठे सामाजिक कार्य केले.

  यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी,”डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची ओळख करून देताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व कोपरगावचे माजी आमदार कै.के.बी.रोहमारे आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांचे ऋणानुबंध होते,म्हणूनच के.बी. रोहमारे यांनी देशमुख यांना कोपरगाव येथे आमंत्रित देखील केले होते,असे शेवटी सांगितले आहे.

यावेळी अमरावती येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय राऊत व डॉ. दोरगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ.जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक व अतिथींचा परिचय करून उपस्थितांचे आभार मानले आहे.


जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close