जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात मोठी कोरोना रुग्णवाढ !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.कोपरगावात तर काही माहिन्या पासून त्यात क्वचित वाढ तर अन्यवेळी स्थिर दर दिसत दिसत आहे.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५८६ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ११ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५७५ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४३४ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १४ तर अँटीजन तपासणीत ११ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०५ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण ३० रुग्ण बाधित आढळले आहे.तर २८ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ०६१ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १६३ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१० जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६१ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख २४ हजार ३७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०४ लाख ९७ हजार ५१६ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १०.५० टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ६८८ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.१४ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ८४ हजार ३९९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार ६३७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ७२ हजार ६२१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार १४० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून गोव्यात व कोकण मराठवाड्याच्या काही भागात विक्रमी रुग्ण आढळले आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व शनिवार रविवार बंद ठेवला आहे.व अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतच आपली दुकाने सुरु ठेवता येत आहे.डेल्टा प्लसने उचल खाल्ली असून राज्य शासन हादरले आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढु लागले आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.तर काही भागात तरुण आपले वाढदिवस भर रस्त्यात करून कोरोना साथीला निमंत्रण देताना दिसत आहे.तर राजकीय नेत्यांनी कथनी करणीला अंतर देत आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद,पंचायत समीतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समारंभ समारंभ सुरु केल्याने चिंता वाढली असून त्यातून रुग्ण वाढण्याचा क्रम वाढला आहे.त्यामूळे आता नगरपरिषद व शहर पोलिसांनी आता कडक धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाली असून त्याची अमलबजावणी काल पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सुरु केली असल्याचे कालचे चित्र आहे.त्यांनी मुखपट्या विना केळी विक्री करणाऱ्या पाच ते सहा व्यापाऱ्यांची उचलबांगडी केली असल्याने या बेशिस्त व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close