आरोग्य
कोपरगाव तालुक्यात आज पुन्हा मोठी रुग्णवाढ,एका रुग्णांचा मृत्यू

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ३४३ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या २२० असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.४७ टक्के आहे.तर एकूण २२ हजार ०३२ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८८ हजार १२८ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १५.१७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ०७४ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९१.९५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७९ हजार ४४४ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०२ हजार ७६६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ७५ हजार ५०६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १७१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण-२४ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.लक्ष्मीनगर पुरुष वय-४१,सराफ बाजार पुरुष वय-४६,कोपरगाव सहा पुरुष वय-३०,५६,५२,५६,११,४८,दोन महिला वय-६१,४८,भगवती कॉलनी पुरुष वय-६२,राम मंदिर महिला वय-३१,मांढरे वस्ती संजीवनी-पुरुष वय-२३,निवारा पुरुष वय-४७,साई सिटी पुरुष वय-३१,धारणगाव रोड पुरुष वय-२५,नगर-मनमाड रोड पुरुष वय-७५,मांढरे वस्ती एक पुरुष वय-५७,गांधीनगर एक पुरुष वय-५५,सप्तश्री मळा पुरुष वय-३९,ओमनगर पुरुष वय-४७,अंबिकानगर वय-दोन पुरुष वय-४७,४६,एक महिला वय-२४,आदींचा समावेश आहे.
तर तालुका हद्दीतील ४० रुग्ण पुढील प्रमाणे सुरेगाव पुरुष वय-२७,चांदेकसारे पुरुष वय-६५, तर मुर्षातपुर पुरुष वय-४५,३६,धारणगाव महिला वय-५०, खिर्डी गणेश महिला वय-४५,आदींचा समावेश आहे.ब्राम्हणगाव येथील एक पुरुष वय-५०,शिंगणापूर महिला वय-२३,४४,१७,३८,४८,पुरुष वय-२१,४५,मढी पुरुष वय-६२,टाकळीव एक पुरुष वय-२१,४५,महिला वय-३०,३७,५५,२६,३५,कोळपेवाडी पुरुष वय-३०,जेऊर कुंभारी पुरुष वय-४३, वय-३४,ब्राम्हणगाव पुरुष वय-४५,३४,करंजी पुरुष वय-२३,५५,जेऊर पाटोदा पुरुष वय-१७,८२,महिला वय-४१,४५,५०,कोकमठाण वय-४४,शहापूर पुरुष वय-६७,दहिगाव बोलका पुरुष वय-१८,५१,नाटेगाव पुरुष वय-५४,कारवाडी पुरुष वय-६५,आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.