जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

डाव्या कालव्यांचे अस्तरिकरणाचे काम सुरू करा -…यांची मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   गोदावरी उजव्या कालव्यावरील माती काम,बांधकाम व अस्तरीकरण करण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले उजव्या कालव्याबरोबर डाव्या कालव्याचे व चाऱ्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचेकडे केली आहे.

  

“गोदावरी कालव्यांचे आयुर्मान १०० वर्षापेक्षा जास्त झालेले असून दरवर्षी लोकसंख्या वाढत आहे.धरणातील पाण्यावर पिण्याचे व औद्योगिकरणाचे आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पर्यायाने शेतीसाठी पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.ते वाढविणे गरजेचे आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

    महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम टप्पा १ अंतर्गत १९१.५८ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या गोदावरी उजवा तट कालव्यावरील माती काम,बांधकाम व अस्तरीकरण करणे कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दि.०२ मे रोजी राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या शुभहस्ते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी आ.आशुतोष काळे बोलत होते.

     सदर प्रसंगी खासदार धनंजय महाडिक,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के,माजी खा.सुजय विखे,जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दिपक कपूर,लाभक्षेत्र विकास सचिव डॉ.संजय बेलसरे,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार,जलसंपदा उत्तर विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ,कार्यकारी अभियंता सोनल शहाणे,उपविभागीय अभियंता तुषार खैरनार,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अभय शेळके,शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते आदींसह महायुतीचे कार्यकर्ते,शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   तत्पूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांचे काकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता आ.काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”गोदावरी कालव्यांचे आयुर्मान १०० वर्षापेक्षा जास्त झालेले असून दरवर्षी लोकसंख्या वाढत आहे.धरणातील पाण्यावर पिण्याचे व औद्योगिकरणाचे आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पर्यायाने शेतीसाठी पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.कमी झालेल्या पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला अती तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविणे अत्यंत गरजेचे आहे.हे पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचे काम जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हातून पूर्ण व्हावे व ते निश्चितपणे पूर्ण करतील आणि गोदावरी खोऱ्याची पाण्याची तुट भरून काढतील असा विश्वास आ.काळे यांनी याबाबत शेतकरी संघटनेने मागील वर्षी ०५ जानेवारी रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका (५/२०२४) दाखल केल्यानंतर व्यक्त केला आहे हे विशेष !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close