क्रीडा विभाग
कोपरगावात ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य व खेळासाठी सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्यास कोपरगावचे खेळाडू निश्चीतपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील याचा आपल्याला विश्वास असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“अ.नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे यामध्ये कोपरगाव तालुक्याचा देखील समावेश असावा हि आपली इच्छा आहे.त्यामुळे मतदार संघातील खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी माझे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव शहरातील के.बी.पी.विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर आ.आशुतोष काळे मित्रमंडळ,फ्रेंड्स क्रिकेट क्लब, श्री साई समर्थ प्रतिष्ठाण,साई सिटी क्रिकेट क्लब व माऊली क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित,’आमदार चषक’ ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे (के.पी.एल.) उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राजेंद्र कोयटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले,शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,कार्याध्यक्ष संतोष चवंडके,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,रमेश गवळी,कृष्णा आढाव,राजेंद्र वाकचौरे,दिनकर खरे,अजीजशेख,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,डॉ.तुषार गलांडे,चंद्रशेखर म्हस्के,बाळासाहेब रुईकर,वाल्मिक लहिरे,स्पर्धेचे आयोजक सोमनाथ आढाव,अनिरुद्ध काळे,अमोल गिरमे,संकेत पारखे आदींसह सहभागी संघाचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहरात तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवे क्रिकेट पर्व सुरू होत असून हि परंपरा यापुढे सुरु ठेवा.जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे यामध्ये कोपरगाव तालुक्याचा देखील समावेश असावा हि आपली इच्छा आहे.त्यामुळे मतदार संघातील खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी माझे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.आय.पी.एल.क्रिकेट स्पर्धा क्रिकेट रसिकांची पहिली पसंद आहे.या आय.पी.एल.क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक अष्टपैलू खेळाडू उदयास येत असून के.पी.एल. स्पर्धा आयपीएल स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी उत्तम माध्यम ठरणार असल्याचा विश्वास आ. काळे यांनी शेवटी व्यक्त करून आयोजकांनी स्पर्धेचे चांगले नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले आहे.
सदर प्रसांगी ड़ॉ.अनिरुद्ध काळे यांनी प्रास्तविक केले तर सूत्रसंचालन विरेन बोरावके यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार मंदार पहाडे यांनी मानले आहे.