आंदोलन
शेतातून विद्युत वाहिनी तारा स्थलांतरित करा-अन्यथा दावा ठोकणार,इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील कोपरगाव शहर व टाकळी शिवारात वीज तारांमुळे लागणा-या आगीत बागायती शेतीमाल व फळबागांचा मोठे नुकसान होत आहे.या बाबतीत उपाययोजना म्हणून कोपरगाव विद्युत उपकेंद्रा पासून रवंदा उपकेंद्रा पर्यंत जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीचा कंडक्टर बदलून नवीन टाकणेबाबत अथवा सदरची मुख्य विद्युत वाहिनी कुंभारी गाव मार्गे किंवा अन्य मार्गे कायम स्वरूपी स्थलांतरित कराव्यात अन्यथा वीजतारामुळे आगीत बागायती शेतीचे संभाव्य नुकसान भरपाईसाठी वीज वितरण वर १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याचा ईशारा कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. शंकरराव आढाव यांनी नुकताच एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
कोपरगाव विद्युत उपकेंद्रा पासून रवंदे धामोरी पर्यंत जाणारी मुख्य विद्युत वाहिनी आढाव कुटुंबाच्या क्षेत्र स. नं. १५८ व १५९ या जमिनीमधून गेलेली आहे.सदरच्या मुख्य वाहिनीचे काम होऊन बरीच वर्षे झालेली आहेत,त्या वाहिनीच्या विद्युत वाहक तारा अतिशय जुण्या झालेल्या आहेत.त्यामुळे मुख्य वाहिनीच्या वीज वाहक तारा तुटतात.त्या तारा जुन्या झाल्यामुळे सतत ठिणग्या उडून आगी लागत असतात.त्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे.
याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म. (संगमनेर विभाग) चे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य,कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अनिकेत निरभवणे यांना तसे लेखी पत्र देवून कळवले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शिवारातील स.नं. १५८ व १५९ मध्ये आढाव कुटुंबाचा १७ एकर पेरू व ४ एकर चिकू बाग आहे.असा मिळून एकूण २१ एकर पंचवीस वर्ष जुनी फळबाग आहे.सदर बागेत सेन्द्रीय पध्दतीने फळझाडांची जोपासना केली आहे.त्यासाठी बागेत जमिनीवर सेन्द्रीय खत म्हणून दर वर्षी १५० टन ऊंसाचे पाचट पसरविले जाते.त्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात गांडूळ तयार झालेले आहेत.
कोपरगाव विद्युत उपकेंद्रा पासून रवंदे धामोरी पर्यंत जाणारी मुख्य विद्युत वाहिनी आढाव कुटुंबाच्या क्षेत्र स. नं. १५८ व १५९ या जमिनीमधून गेलेली आहे.सदरच्या मुख्य वाहिनीचे काम होऊन बरीच वर्षे झालेली आहेत,त्या वाहिनीच्या विद्युत वाहक तारा अतिशय जुण्या झालेल्या आहेत.त्यामुळे मुख्य वाहिनीच्या वीज वाहक तारा तुटतात.त्या तारा जुन्या झाल्यामुळे सतत ठिणग्या उडत असतात.याबाबत दि.११ एप्रिल रोजी श्री.आढाव यांनी पत्र देऊन लेखी सुध्दा कळविलेले आहे.परंतु वीज वितरण कडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे त्या मुख्य वाहिनीची एक तार दि.२१ डिसेंबर रोजी भास्कर खंडीझोड या शेतकऱ्याच्या तोडणीस आलेल्या उभ्या ऊंसाचे पिकात तुटून पडली व त्यामुळे भास्कर खंडीझोड या शेतकऱ्याचा ३ एकर ऊसाचे पिकाला आग लागली व त्यांचा तोडणीस आलेला ०३ एकर ऊंस आगीत जळून खाक झाला. तसेच त्या आगीमुळे खंडीझोड यांचे शेजारचे शेतकरी कैलास जाधव यांचे २ एकर तोडणीस आलेला ऊस पिकाला सुध्दा आग लागून २ एकर ऊस आगीत जळून खाक झाला आहे.अशा तऱ्हेने आपल्या निष्काळजीपणामुळे सदर शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे.
वरील प्रमाणे दुर्दैवी घटना होऊनही सुमारे तीन महिन्यांचा कालावधी होऊनही वीजवितरण अधिकारी यांनी सदर मुख्य वाहिनीचे कंडक्टर बदलण्याकामी कोणतीही दखल घेऊन कारवाई केलेली नसल्याने परिसरातील शेतकरी सतत तुटणा-या तारांमुळे भयभीत झाला असून यातून जिवित हानी संभवत असल्याचे वीज वितरण विभागास निदर्शनास आणून दिले आहे.
आढाव यांचे जमिनीतून गेलेल्या वीज तारांच्या स्पार्किंगमुळे दि.१ एप्रिल रोजी चिकूच्या बागेला आग लागली व २५ वर्षे वयाची ६ चिकूची झाडे जळून खाक झाली.चिकूच्या झाडाचे आयुष्य हे किमान १०० वर्षे आहे.त्यामुळे आमचे सुमारे ६ ५० लाख रूपयांचे नुकसान झालेले आहे.त्याबाबत नुकसान भरपाई मागणेचे व मिळणेचे आमचे हक्कास बाध न येता आढाव यांनी पत्रा द्वारे कळवित आहोत.
वीज वितरणने तातडीने सदर जुनी झालेल्या मुख्य विद्युत वाहिनी तारा बदलून त्या ठिकाणी नवीन तारा टाकावा.श्री.आढाव व शेतक-यांच्या मागणीकडे निगरगट्टपणे दुर्लक्ष केल्यास व भविष्यात दुर्दैवाने तेथील पेरू व चिकूच्या एकूण २१ एकर फळबागेला आग लागल्यास,संगमनेर,कोपरगाव येथील व्यक्तिशः अधिकारी व म.रा.वीज वितरण कंपनी यांना जबाबदार धरले जाईल व तुमचे कडून बागेची नुकसान भरपाई म्हणून १०० कोटी रूपये फक्त ची मागणी सक्षम न्यायालयात केली जाईल व ती रक्कम व्यक्तिशः तुमच्या सर्वांच्या पगारातून व पेन्शनमधून वैयक्तिक व संयुक्तरित्या सक्तीने वसूल केले जातील.
तसेच कोपरगाव नगर परिषदेने हद्दवाढ केलेली आहे.स.नं. १५९ पर्यन्तचा भाग कोपरगाव नगरपरिषद हद्दीत आला आहे.शहरांची वस्ती वाढत आहे.त्यामुळे कोपरगाव ते रवंदे मुख्य विद्युत वाहिनी गावामधून जाणे अतिशय धोकादायक आहे.त्यामुळे आग लागल्यास व लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका पोहचून नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सदरची मुख्य विद्युत वाहिनी दुसरीकडून कुंभारी मार्गे अगर योग्य त्या अन्य मार्गे स्थलांतरित करण्यात यावी.अन्यथा नुकसान भरपाई म्हणून १०० कोटी रूपये फक्त ची मागणी सक्षम न्यायालयात केली जाईल असा इशारा कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड.आढाव व परिसरातील शेतकरीवर्ग यांनी दिला आहे.