जाहिरात-9423439946
दळणवळण

देवळाली प्रवरा मध्ये विकास पर्व सुरु-जिल्हाध्यक्ष यांचा दावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

देवळाली प्रवरा-(प्रतिनिधी)

प्रहार मुळे देवळाली प्रवरा मध्ये विकास पर्व सुरु झाले असल्याचा दावा प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी नुकताच देवळाली प्रवरा येथील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

“प्रसाद नगर येथील नागरिकांना तब्बल ४० वर्षानंतर ‘प्रहार’ मुळे पाणी मिळाले तसेच काकडे वस्ती,वरखडे वस्ती आणि सांबरे वस्ती नंतर आता हरगुडे वस्ती वरील नागरिकांना भंडारदरा कॅनॉल ओलांडण्यासाठी तब्बल ५० वर्षे वाट पहावी लागली ही शोकांतिका आहे”-अभिजित पोटे,अध्यक्ष,प्रहार संघटना,नगर जिल्हा.

राहुरी फॅक्टरी येथील हरगुडे वस्ती भंडारदरा कालव्यावर ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू यांचे मार्गदर्शनाखाली जवळपास दहा लक्ष रुपये खर्चाच्या लोखंडी पादचारी पुलाचे उद्घाटन आणि लोकार्पण ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले,राहुरी येथील प्रतिथयश उद्योजक स्वप्निल उदावंत,प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ,मेजर महादेव आव्हाड,विधीज्ञ पांडुरंग औताडे,अनिल औताडे,विकास कोतकर, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस,प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे,प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष किरण पंडित,उपाध्यक्ष अशोक देशमुख,राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज,उपाध्यक्ष एकनाथ वाणी,गणेश भालके,देवळाली प्रवरा महिला शहराध्यक्ष भाग्यश्री कदम,राहुरी फॅक्टरी महीला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे,उपाध्यक्ष आशा माळी,वंदना कांबळे,संघटक सुनील कदम,इमरान शेख,सनी सोनवणे,प्रहार श्रमिक संघाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण,प्रहार दिव्यांग संघटनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सलीम शेख,प्रहार गळलिंब शाखाध्यक्ष कृष्णा शेळके,आदर्श नागरी पतसंस्थेचे नूतन व्हा. चेअरमन आबासाहेब वाळुंज,शंकर हारगुडे,नवनाथ हारगुडे,हारगुडे वस्ती नूतन शाखा अध्यक्ष सुरेश मोरे,उपाध्यक्ष दिपक हारगुडे,अभय काकडे,विजय वाडकर आदी सह शेटे वाडी व जाधव वस्ती येथील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पुढाऱ्यांची मुले राजकारणात पुढे आणण्यासाठी खंड,पर्व सुरू झाले असे सांगीतले जाते.परंतु कोणतेही राजकीय पद नसलेल्या प्रहारच्या आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा मधील नागरिकांना जवळपास दहा लक्ष रूपये खर्चाचा चौथा लोखंडी पुल दिल्याने देवळाली प्रवरा मध्ये विकास पर्व सुरु झाले आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

प्रसाद नगर येथील नागरिकांना तब्बल ४० वर्षानंतर ‘प्रहार’ मुळे पाणी मिळाले तसेच काकडे वस्ती,वरखडे वस्ती आणि सांबरे वस्ती नंतर आता हरगुडे वस्ती वरील नागरिकांना भंडारदरा कॅनॉल ओलांडण्यासाठी तब्बल ५० वर्षे वाट पहावी लागली ही शोकांतिका आहे.आणि पन्नास वर्षानंतर प्रहारच्या प्रयत्नाने या नागरिकांना लोखंडी पूल मिळाल्याने खऱ्या अर्थाने देवळाली प्रवरा येथे विकास पर्व सुरू झाले असल्याचा दावा केला आहे.

प्रसंगी विधी तज्ञ पांडुरंग औताडे,जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले आप्पासाहेब ढूस आदींनीं उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक आप्पासाहेब ढुस यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल औताडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रहारचे प्रसिद्ध प्रमुख राजेश मंचरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close