जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावच्या ग्रामीण भागात रुग्णवाढ थांबणार कधी ?

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १३७ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात १९ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी अन्य १०० स्राव पाठवले आहे तर येथुन आलेल्या अहवालात एकही स्राव बाधित आला नाही तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेत ०२ रुग्ण बाधित आढळले आहे. आज एकूण २१ जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या १० रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.शहरात व ग्रामीण भागात आज रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६३ हजार ७०९ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९३८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे.त्यामुळे आ.काळे यांनी उपाय योजनांसाठी नुकतीच तातडीची बैठक बोलावली होती त्यामुळे गांभीर्य वाढले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात आज ०३ रुग्ण आढळले आहे.त्यात सप्तर्षी मळा एक पुरुष वय-६४, धान्यमार्केट यार्ड महिला वय-३५,गांधीनगर एक पुरुष वय-६३,आदींचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागात १८ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात करंजी एक पुरुष वय-५६,रवंदे पुरुष वय-२४,महिला वय-५२,मायगाव देवी येथील पुरुष रुग्ण वय-१४,महिला वय-३०,०७,धामोरी एक पुरुष वय-३४,१०,२४,२०,३४ महिला वय-३८,१६,४०,संवत्सर पुरुष वय-५५,३३,महिला वय-५८,तीन चारी पुरुष वय-४८,आदीं जास्त संख्येने रुग्ण बाधित आढळले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ४५८ इतकी झाली आहे.त्यात १०८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ४० जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६२ टक्के आहे.आतापर्यंत १७ हजार ०१७ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ६८ हजार ०६८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.४४ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ३१० इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९३.९७ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात मोठी रुग्ण वाढ होण्याबरोबरच ग्रामीण भागात मात्र आज रुग्ण संख्या झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close