जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १८२ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात २० रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी १६७ स्राव पाठवले आहे तर येथुन आलेल्या अहवालात एकही स्राव बाधित आला नाही.तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेतील ०४ जण बाधित आले असून उपचारा नंतर ०२ जणांस सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५९ हजार ९७७जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९२१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण होते आता मात्र ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आज एकही रुग्ण बाधित आढळला नाही.तर ग्रामीण भागात २० रुग्ण बाधित आढळले आहे त्यात कोळगाव थडी येथील सात विक्रमी रुग्ण असून त्यात पुरुष तीन वय-४५,१०,१२ महिला चार वय-२१,१५,६०,३५ येसगाव येथे दोन पुरुष वय-४७,६५,महिला वय-५५ तर ब्राम्हणगाव पुरुष वय-१५ तर दोन महिला वय-६५,६५,मुर्शतपूर पुरुष वय-२५,२७,६०,महिला वय-४८,गोधेगाव येथील पुरुष वय-३७,२९,एक महिला वय-२० असे रुग्ण बाधित आढळले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार २७१ इतकी झाली आहे.त्यात ४८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६२ टक्के आहे.आतापर्यंत १३ हजार ७४५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ५४ हजार ९८० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १६.५२ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार १८६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९७.२५ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात रुग्ण कमी होण्याबरोबरच ग्रामीण भागात मात्र आज रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.