कोपरगाव तालुका
विकासाच्या आड येणाऱ्या अपप्रवृत्तीना भिक घालणार नाही-आव्हान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघाचा होत असलेला विकास काही सामाजिक तत्वांना सहन होत नसल्याने त्यानीं विकासात राजकारण आणून विकासालाच आडवे येण्याचा प्रयत्न होत असला तरी विकासाच्या आड येणाऱ्या अशा अपप्रवृत्तीना आज पर्यंत कधीही भिक घातली नाही व यापुढेही घालणार नाही असा इशारा आ.आशुतोष काळे यांनी विरोधकांना ईशारा दिला आहे.
सदर प्रसंगी कोल्हे गटाचे बाजीराव होन,दादासाहेब दहे,दीक्षित दहे,संदीप दहे,सुनील होन,आप्पासाहेब ढमाले,दौलत दहे,सचिन ढमाले,राजेंद्र गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु.येथे जलजीवन मिशन अंतर्गत ६० लक्ष ८५ हजार रुपये निधीतुन करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ व नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ९ लक्ष ७५ हजार रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचा उदघाटन समारंभ नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक शंकरराव चव्हाण,राहुल रोहमारे,प्रविण शिंदे,विष्णू शिंदे,शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधुजी कोळपे,माजी उपसभापती अर्जुन काळे,आनंदराव चव्हाण,मच्छिन्द्र दहे,भिवराव दहे,धर्मा दहे,बाळासाहेब पवार,नंदकिशोर औताडे,विक्रम बाचकर,शिवाजी दहे,धनराज पवार,भानुदास दहे,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,अभियंता चांगदेव लाटे,शाखा अभियंता अश्विन वाघ,राजेंद्र दिघे,ग्रामसेवक महेश काळे आदीं मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”सार्वजनिक विकासकामांचा फायदा हा मर्यादित नागरिकांना होत नसून तो सर्व नागरिकांना होत असतो त्यामुळे मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने निधी देतांना कधीही दुजाभाव केला नाही आणि करणार नाही.मात्र नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण करून कुठे तरी विकासकामात आडवे यायचे असा काहींना छंद असतो.जनतेने संधी देवून देखील त्यांना विकास करता आला नाही अशा विघ्नसंतोषी प्रवृत्ती विकासाच्या आड येण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नसून आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही चांगल्या तालमीत तयार झालो असून जशास तसे उत्तर देण्याची आमची नेहमीच तयारी असते हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.सरकार बदलले असले तरी विकास कामे थांबणार नाही.सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापूर्वी होत असलेला पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील.विरोधी पक्षाचा आमदार असतांना देखील सत्ताधारी पक्षाकडून निधी आणण्यासाठी बांधील असल्याची ग्वाही शेवटी आ.काळे यांनी दिली आहे.
सदर प्रसंगी कोल्हे गटाचे बाजीराव होन,दादासाहेब दहे,दीक्षित दहे,संदीप दहे,सुनील होन,आप्पासाहेब ढमाले,दौलत दहे,सचिन ढमाले,राजेंद्र गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.