जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात गोवंश कत्तल सुरूच,नगराध्यक्षांचा गंभीर इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गोवंश हत्या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.आता तर हा व्यवसाय थेट घरातून चालवला जात असून याचे बंद पाकिटातील मांस ग्राहकांच्या घरी पोहचवले जात असल्याच्या खात्रीशीर बातम्या हाती आल्या आहेत.मात्र यावर पोलीस व नगरपरिषद हे एकमेकांवर जबाबदारीची चालढकल करताना दिसत असून त्यावर संतापलेल्या कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी थेट प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या दरबारात कैफियत मांडून न्याय मागीतला आहे.

दरम्यान एका माहितीनुसार कोपरगाव नगरपरिषदेने या बाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संबधित खाटकांना कोपरगाव शहर पोलिसांनी नगरपरिषदेस दि.२६ ऑक्टोबर रोजी संजयनगर,सुभाषनगर,आयशा कॉलनी,बैलबाजार रोड येथील अवैध कत्तल खान्याच्या बांधकामाबाबत कळवले असून त्या नुसार अवैध बांधकामे तात्काळ काढून घेण्याचे फर्मान काढले आहे.व न काढल्यास नगरपरिषद याबाबत कायदेशीर कारवाई करील असे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी बजावले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सन-१९९५ मध्ये युती सरकारने विधिमंडळात प्राणिरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले.१९९६ मध्ये ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.पुढे राज्यात सत्ताबदल झाला.राज्यात सन-२०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.गाय,बैल,वळू यांची कत्तल करता येणार नाही,त्या हेतूने त्यांची खरेदी,विक्री करता येणार नाही,विल्हेवाट लावता येणार नाही.असा कायदा करण्यात आला मात्र हा कायदा केवळ कागदावरच आहे.त्याचे वर्तमानात नगरपरिषद व पोलिसांच्या नाकावर टिच्चून संजयनगर,सुभाषनगर परिसरात सर्रास उल्लंघन सुरू आहे.तीन वर्षांपूर्वी तर ऐन शिवरात्रीच्या दिवशी लाखो रुपयांचे गोवंश नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी धाड टाकून पकडून दिले होते.त्या नंतर वारंवार गोदावरी नदीत कोपरगावात होणाऱ्या गोवंशाच्या कत्तलीचा रक्ताचा महापूर येत असून त्याचा नदीकाठच्या हिंदू देवतावर रक्ताभिषेक होत आहे.मात्र शहर पोलीस व नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करत आहे.त्या निषेधार्थ कोपरगाव नगरपरिषदेवर कोपरगाव तालुका गोरक्षा समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी दि.१२ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचा जोरदार निषेध केला होता.यावर निर्णय घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत ठरवून दिली आहे.मात्र तरीही मोठ्या शेडमधील कत्तल थांबली असली तरी आता या व्यवसायातील व कसाई व व्यापाऱ्यांनी आता थेट आपल्या घरातच कत्त्तलखाने बनवून त्या गोवंशाच्या रक्ताचे पाट थेट गोदावरी नदीत काढून दिले आहे.त्यामुळे हे मुजोर खाटीक आता पोलीस आणि नगरपरिषद यांना वाकुल्या दाखवू लागले आहे हे विशेष ! त्यामुळे या पार्श्वभूमीवर नगरपरिषदही हताश झालेली दिसत असून नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी या प्रकरणी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना एक निवेदन पाठवून याबाबत दाद मागितली आहे.व या प्रकरणी जवळपास ८२ संघटनांनी या विरोधात आवाज उठवला असून कारवाईची मागणी केली असल्याचे म्हटले आहे. गोदावरी नदीचे पावित्र्य भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.या अगोदर सराला बेटांचे महंत श्री रामगिरीजी महाराज यांनी तर “या बेताल गोवंशाची कत्तल करणाऱ्यांना भाषा समजत नसेल तर, त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देण्याचा” इशारा दिला आहे.त्यांच्या सुरात सूर श्री क्षेत्र मंजूर येथील श्री शिवानंदगिरीजी महाराज यांनीही मिळवला आहे.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य खूपच वाढले आहे.यावर प्रशासन चालढकल करत असेल तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा अध्यक्ष वहाडणे यांनी दिली आहे.व आपणही या आंदोलनात सहभागी होऊ असे बजावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close