जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या-आ. आशुतोष काळेंची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

गत आठवड्यापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघात पडत असलेल्या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांना बसला आहे. शेतात काढून पडलेल्या सोयाबीन, बाजरी, या पिकांना मोड फुटले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी कोपरगाव विधानसभेचे नूतन आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आदी पिकांची पेरणी केली होती. पावसाचा लहरीपणा सहन करीत पिके कशीबशी काढणीला आली होती. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच डाळिंब, द्राक्ष आदी फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

त्यांनी पाठवलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, चालू वर्षी कोपरगाव विधानसभा मतदार संघात पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आदी पिकांची पेरणी केली होती. पावसाचा लहरीपणा सहन करीत पिके कशीबशी काढणीला आली होती. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच डाळिंब, द्राक्ष आदी फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पावसामुळे क्षतिग्रस्त झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभाग व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकतेच दिले असून आज सकाळी कोपरगाव येथे तहसीलदार योगेश चंद्रे ,गटविकास अधिकारी सोमनाथ सोनकुसळे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली असून आगामी दोन दिवसात हे पंचनामे करण्याचे फर्मान काढले आहे.

मागील काही वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्युहातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना. यावर्षी पिकांना आवश्यक असलेला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळण्याची खात्री होती मात्र आजपर्यंत कधी एवढा न झालेल्या परतीच्या पावसाने सर्वच पिकांची नासाडी केली आहे. या पावसामुळे काढणी झालेल्या पिकांना शेतातच मोड फुटले आहे. हजारो हेक्टर शेती पिकासह पाण्यात असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी सण साजरा होणार नाही अशी परिस्थिती संपूर्ण कोपरगाव मतदार संघात आहे. प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा व झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close