जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायतीचा राजकीय शिमगा सुरु

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी आज येथे केली आहे.त्यामुळे ऐन हिवाळ्यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसह ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात कोल्हे व काळे हे पारंपरिक राजकीय विरोधक असून परजणे,शिवसेना,भाजप निष्ठावान गट (वहाडणे) आदींचा राजकीय शिमगा रंगणार आहे.आता राजकारणात कोल्हे काळे यांची तिसरी पिढी कार्यरत झाली आहे.तसे राजकारणांची पातळी घसरली आहे.मुबलक पैसा,दारू,आणि कार्यकर्त्यांची खरेदी या पलीकडे जाऊन राजकारण होणार का ? हा औत्सुक्याचा विषय आहे.त्यामुळे यावर्षी होणाऱ्या निवडणुका आता तिसरी पिढी कशी हाताळणार या कडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

श्री.मदान यांनी सांगितले की,”ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल.विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:

अहमदनगर-२०३,अकोला-२६६,अमरावती-२५७,औरंगाबाद-२१९,बीड-७०४,भंडारा-३६३,बुलडाणा-२७९,चंद्रपूर-५९,धुळे-१२८,गडचिरोली-२७,गोंदिया-३४८,हिंगोली-६२,जळगाव-१४०, जालना-२६६,कोल्हापूर-४७५,लातूर-३५१,नागपूर-२३७,नंदुरबार-१२३,उस्मानाबाद-१६६,पालघर-६३,परभणी-१२८,पुणे-२२१,रायगड-२४०,रत्नागिरी-२२२,सांगली-४५२,सातारा-३१९, सिंधुदुर्ग-३२५,सोलापूर-१८९,ठाणे-४२,वर्धा-११३,वाशीम-२८७,यवतमाळ-१००,नांदेड-१८१ व नाशिक-१९६ अशा एकूण-7 हजार 751 ग्रामपंचायतीचे रणशिंग फुंकले आहे.

दरम्यान यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायती असून त्यात भोजडे,सडे,शिंगणापूर,वेस-सोयगाव,कोळपेवाडी,वडगाव,मोर्विस,खिर्डी गणेश,पढेगाव,चासनळी,माहेगाव देशमुख,रांजणगाव देशमुख,शहापूर,बहादराबाद,डाऊच बु.डाऊच खु.देर्डे-कोऱ्हाळे,तळेगाव मळे,चांदेकसारे,धारणगाव,हंडेवाडी,बत्तरपूर,सोनेवाडी,खोपडी,करंजी बु.बहादरपूर आदींचा त्यात समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close