निवडणूक
…या भाजप नेत्यास विधान परिषद उमेदवारी द्या -मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकासआघाडीला धक्का दिला असून या अकरा जागांपैकी महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले तर महाविकासआघाडीच्या दोन उमेदवारांना यश मिळालं असून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीत स्वकियापासून तडाखा बसल्याने सावध झालेल्या भाजपने आता निष्ठावान भाजप नेत्यांना प्राधान्य देण्याचे ठरवले असून या जागेवर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खा.स्व.सूर्यभान वहाडणे यांचे सुपुत्र व कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झालेले माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांची वर्णी लावावी अशी जोरदार मागणी कोपरगाव भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

“शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात प्रदेशाध्यक्ष असलेले व ज्यांनी भाजप वाढविण्यासाठी आधी सायकल व नंतर मोटारसायकलवर आपली हयात घालवली ते माजी खा.स्व.सूर्यभान वहाडणे यांचे विजय वडाहणे हे सुपुत्र असून त्यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक आंदोलने केली आहे.माजी खा.सूर्यभान वहाडणे यांचा राज्य भाजप मध्ये मोठा नैतिक दरारा होता.त्यांचे सुपुत्र विजय वहाडणे यांनी गत नगर परिषद निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळवला होता.व सर्वाधिक विकास कामे केली आहे”- प्रभाकर वाणी,माजी अध्यक्ष,कोपरगाव शहर भाजप.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या विधान परिषदेत अगदी थोड्याच आमदारांसह कामकाज सुरू आहे.असं असताना नुकत्याच झालेल्या अकरा जागांकरिता निवडणुकीतून अकरा आमदार विधानपरिषद आलेत तर आता राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची देखील लवकरच विधान परिषदेमध्ये वर्णी लागेल बोलले जाऊ लागले आहे.याकरता राज्य सरकारने पावले उचलली आहेत.हे गणित विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे हे उघड आहे.कारण विधानसभा जितकी महत्त्वाची आहे,विधानसभेतील संख्याबळ जितकं महत्त्वाचं आहे तितकच संख्याबळ आणि तितकंच महत्त्व किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्व हे विधान परिषदेला आहे,हे सत्ताधाऱ्यांना कळून चुकलंय,यामुळेच आता विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची लवकरच नियुक्ती केली जाईल असे बोलले जात असून त्या दृष्टीने राज्यात सत्ताधारी पक्षाकडून या हालचालींना वेग आला आहे.

कोपरगाव विधान सभा निवडणुकीत त्यांनी भाजप मध्ये आलेल्या काँग्रेसी नेत्यांना आयत्या बिळात जागा देऊन पायावर धोंडा पाडून घेतला होता.त्यातून राज्यातील निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची जी होरपळ झाली तीच कोपरगावसह अ.नगर जिल्ह्यातील नेत्यांची झाली आहे.एवढ्यावर ही आयात मंडळी थांबली नाही त्यांनी विजय वहाडणे यांना भाजप मधून काढून टाकण्याचे कुटील कारस्थान केले होते.आता ही मंडळी अवघ्या दहा वर्षात दुसरा घरोबा शोधत आहे.यातच सर्व काही आले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शिरस्थ नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघास दुर्लक्षित केले होते.परिणामी भाजपला मोठी किंमत मोजावी लागली आहे.नागपूर येथील चिंतन शिबिरात याचा मोठा उहापोह झाला आहे.दरम्यान ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये असे म्हटले आहे की,”या लोकसभा निवडणुकीकरिता भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते संघाकडे मदत मागण्यासाठी आलेच नाहीत; त्याचाच परिणाम म्हणून पक्षाने इतकी खराब कामगिरी केली असल्याचा कानपिचक्या दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा हा निकाल अतिआत्मविश्वासात असलेल्या भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा असल्याचा आरोप केला आहे.तसेच भाजपाचे नेते प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करण्याऐवजी समाजमाध्यमांवर पोस्ट्स शेअर करण्यात व्यग्र होते”असा टोलाही या लेखामध्ये लगावण्यात आला होता.दरम्यान भाजपने आपली राजकीय चूक सुधारण्याचे मान्य केले असल्याचे वृत्त असून त्या साठी त्यांनी आगामी राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याना खुश करण्यासाठी पावले उचलण्याचे ठरवले असून त्यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहराचे माजी शहराध्यक्ष व भाजपचे निष्ठावान जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर वाणी यांनी ही मागणी केली असून त्यास वजन प्राप्त झाले आहे.
शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात प्रदेशाध्यक्ष असलेले व ज्यांनी भाजप वाढविण्यासाठी आधी सायकल व नंतर मोटारसायकलवर आपली हयात घालवली ते माजी खा.स्व.सूर्यभान वहाडणे यांचे विजय वडाहणे हे सुपुत्र असून त्यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक आंदोलने केली आहे.माजी खा.सूर्यभान वहाडणे यांचा राज्य भाजप मध्ये मोठा नैतिक दरारा होता.त्यांचे सुपुत्र विजय वहाडणे यांनी गत नगर परिषद निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळवला होता.त्यांच्या निवडीनंतर भाजपने त्यांना राज्यातील भाजपच्या मासिकात नगराध्यक्षांच्या यादीत नावही प्रसिद्ध केले होते.मात्र कोपरगाव विधान सभा निवडणुकीत त्यांनी भाजप मध्ये आलेल्या काँग्रेसी नेत्यांना आयत्या बिळात जागा देऊन पायावर धोंडा पाडून घेतला होता.त्यातून राज्यातील निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची जी होरपळ झाली तीच कोपरगावसह अ.नगर जिल्ह्यातील नेत्यांची झाली आहे.एवढ्यावर ही आयात मंडळी थांबली नाही त्यांनी विजय वहाडणे यांना भाजप मधून काढून टाकण्याचे कुटील कारस्थान केले होते.आता ही मंडळी अवघ्या दहा वर्षात दुसरा घरोबा शोधत आहे.त्यांनी दहा वर्षाच्या काळात एकही कार्यकर्ता जोडला नाहीच पण एकही भाजपची साधी शाखा काढली नाही.उलट भाजपच्या निष्ठावान मंडळीचे नितिधैर्य खच्चीकरण केले होते.त्यामुळे आता तरी भाजपने ठिकाणावर येऊन माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर आमदार म्हणून विजय वहाडणे यांची नियुक्ती करावी अशी मागणी प्रभाकर वाणी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलंताना शेवटी केली आहे.