कोपरगाव तालुका
कोपरगावात आजही रुग्ण वाढ,आलेख खाली येईना !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात अद्याप कोरोना साथीचा प्रभाव वाढतच असून आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास आलेल्या कोरोना श्राव तपासणीचे ५० पैकी ५० अहवाल प्राप्त झाले असून त्यात ४३ निरंक तर सातही रुग्ण बाधित आले आहे.त्यात पढेगाव येथील चार रुग्ण बाधित आले असून त्यात एक ६० वर्षीय पुरुष,एक तीन वर्षीय बालक, तर एक ३१ वर्षीय तर एक ३३ वर्षीय महिला यांचा समावेश आहे तर या खेरीज गांधीनगर येथील दोन महिला बाधित असून यात ६७ वर्षीय तर एक ७३ वर्षीय महिला यांचा समावेश आहे तर सुरेगाव येथील एका ६३ वर्षाचा समावेश आहे.तर यातील ४३ अहवाल निरंक आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या खेरीज एका खाजगी प्रयोग शाळेने पाठवलेल्या ४ अहवालात निवारा परिसरात तीन पुरुष त्यात ४० वर्षीय वडील,३८ वर्षीय पत्नी व अनुक्रमे १४ व ९ वर्षाचा मुलगा असे चार असे एकूण आठ रुग्ण कोरोना बाधित आढळले होते त्यात एका राज्य पतसंस्थेच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या घरातील आपला मुलगा,सून,व दोन नातवंडांचा समावेश होता.त्यांच्यासह काल दिवसभरात एकूण ११ रुग्ण आढळले होते.तो सुरेगाव नंतर सर्वाधिक कोरोना वाढीचा विक्रम नोंदला गेला आहे.आज आलेल्या अहवालात कोपरगाव कापड बाजारातील पती-पत्नी माजी नगराध्यक्ष असलेल्या नेत्यांचा मुलगा,सून नातवंड यांचा अहवाल निरंक आला आहे.
कोपरगाव शहरात काल दुपारी तीन रुग्ण निघाले होते तर रात्री पुन्हा २१ रॅपिड टेस्ट केल्या असता त्यात चार कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यात आलेल्या अहवालात काले मळ्यातील ३ महिला आढळल्या होत्या. त्यात २४,२९, व ५९ वर्षीय महिला तर एक समतानगर येथील एक पन्नास वर्षीचा पुरुष असे चार कोरोना बाधित आढळले आहे. या खेरीज एका खाजगी प्रयोग शाळेने पाठवलेल्या ४ अहवालात निवारा परिसरात तीन पुरुष त्यात ४० वर्षीय वडील,३८ वर्षीय पत्नी व अनुक्रमे १४ व ९ वर्षाचा मुलगा असे चार असे एकूण आठ रुग्ण कोरोना बाधित आढळले होते त्यात एका राज्य पतसंस्थेच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या घरातील आपला मुलगा,सून,व दोन नातवंडांचा समावेश होता.त्यांच्यासह काल दिवसभरात एकूण ११ रुग्ण आढळले होते.आज आलेल्या अहवालात कोपरगाव कापड बाजारातील पती-पत्नी माजी नगराध्यक्ष असलेल्या नेत्यांचा मुलगा,सून नातवंड यांचा अहवाल निरंक आला आहे.काल आलेल्या अहवालात सुरेगाव नंतर सर्वाधिक कोरोना वाढीचा विक्रम नोंदला गेला होता.तर आज आढळलेल्या रुग्ण वाढ सात इतकी आली असून हाही एक आज अखेर तिसऱ्या क्रमांकाचा उतरता विक्रम आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी मुखपट्या वापरण्यासह आपल्या घरात जास्त वेळ घालविणे गरजेचे आहे.विनाकारण बाहेर भटकंती थांबविण्याची गरज आहे.त्यासाठी पुन्हा जनजागृती वाढविणे गरजेचे आहे.