जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला,कोपरगाव तालुक्यातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

धामोरी येथील गावाच्या उत्तरेस साधारण दिड कि.मी.अंतरावर असलेल्या ठाकरे वस्ती येथे बिबट्याने गायीचे वासरे,कुत्रे,आदींवर हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी गंगाधर वाळीबा ठाकरे (वय-६८) हे त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नांत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला  आहे.त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले आहे.त्यामुळे धामोरीसह कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

“या हल्ल्याने धामोरीसह नगर व नाशिक जिल्ह्यातील सीमा भागातील शेतकऱ्यांत या घटनेने दहशत पसरली आहे.या बिबट्याचा कोपरगाव वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा”-माधवराव खिलारी,अध्यक्ष,कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.


दरम्यान या हल्ल्यात कुत्रे जखमी झाले मात्र गळ्यात काटेरी पट्टा असल्याने ते बचावले आहे.मात्र शेतकरी गंगाधर ठाकरे हे गंभीररीत्या जखमी झाले आहे.
यात जखमीस बावन्न टाके पडले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

जखमी शेतकऱ्यांवर उपचार करताना डॉ.कृष्णा फुलसुंदर.


या द्वंद्वात जखमी शेतकरी यांना वाचविण्यासाठी सोळा वर्षीय नातू बॅटरी घेऊन आल्याने बॅटरीच्या प्रकाश झोताने बिबट्या घाबरून पळून गेला आहे.
दरम्यान जखमी शेतकरी ठाकरे यांना
शेजारी असलेले शेतकरी सुनील वाणी यांनी तातडीने चारचाकींने कोपरगाव येथे ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.या घटनेत जखमीस साधारण दहा ठिकाणी बिबट्याने चिरफाड केली आहे.
“या हल्ल्याने धामोरीसह नगर व नाशिक जिल्ह्यातील सीमाभागातील शेतकऱ्यांत या घटनेने दहशत पसरली आहे.या बिबट्याचा कोपरगाव वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा” अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,पोपटराव माळी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close