जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येकडील दुष्काळी गावात कोरोनाची भयावह स्थिती !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात हि वाढ आता कमी अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४८९ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०९ रुग्ण बाधित आढळले असून ४९८ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५३६ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १० तर अँटीजन तपासणीत ०९ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०४ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण २३ रुग्ण या मोठ्या विश्रांतीनंतर बाधित आढळले आहे.तर २६ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.

तथापि कोरोना रुग्णांत लक्षणीयरीत्या कमी आल्यानंतर हि रुग्णवाढ लक्षणीयरीत्या मानली जात असली तरी नैऋत्येकडील रांजणगाव देशमुख व परिसरातील दुष्काळी तेरा गावात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहे.मात्र त्या गावांना राहाता,संगमनेर तालुके जवळ असल्याने उपचारासाठी तेथील रुग्ण त्या तालुक्यात संपर्क करत असल्याने त्याची नोंद कोपरगाव तालुक्यात होत नाही त्यामुळे हे रुग्ण कमी दिसत असले तरी प्रत्यक्षात काकडी,मल्हारवाडी,डांगेवाडी आदींसह बऱ्याच गावात मोठ्या संख्येने रुग्ण वाढ दिसून येत आहे.त्यामुळे या भागातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ६१० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १२४ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१४ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५७ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ५२ हजार २०८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ०८ हजार ८३२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.९४ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार २७२ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.५२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ०४ हजार ६३६ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ७१६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ९३ हजार ४३० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ४८९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून राज्याने आता पुन्हा एकदा निर्बंध उठवले आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढु लागले होते मात्र पावसाने सुरुवात केल्याने हे प्रमाण घटल्याचे मानले जाते.मात्र मोठ्या विश्रांतीनंतर आता रुग्ण कूर्म गतीने वाढू लागले आहे.अन्य जिल्ह्यात वाढताना दिसत आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील काकडी,मल्हारवाडी,डांगेवाडी आदी ठिकाणी रुग्ण लक्षणीयरित्या वाढले आहे हि चिंतेची बाब आहे.याबाबत प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागतील अशी चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close