जाहिरात-9423439946
जगावेगळे

अवयवदान हि वर्तमान काळाची गरज-देशपांडे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

“मेंदूमृत अवस्थेत एक रुग्ण आठ व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो,अशा व्यक्ती सुमारे ६० ते ७० अवयव दान करू शकतात त्यामुळे अवयवदान ही वर्तमान काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांनी कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यावर त्याच्या शरिरातील महत्वाचे अवयव नष्ट होतात,परंतु अंत्यसंस्कारापूर्वी त्या मृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान केल्यास अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते म्हणून अशा वेळी वारसांनी पुढे येऊन अवयवदान केले पाहिजे”-सुनील देशपांडे,उपाध्यक्ष,फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन,मुंबई.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी मातोश्रींच्या निधनानंतर त्यांचे देहदान करण्यात आले.या निमित्ताने चासनळी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने कर्मकांड टाळून विवीध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.रक्तदान शिबिर तसेच अवयवदान यावर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त गावकरी व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”सुगंधाबाई चांदगुडे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनानंतर चांदगुडे यांनी त्यांचा वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केला.त्यानंतरचे कर्मकांड टाळून मारूतीराव दगडू तिडके विद्यालय,केशवराव चांदगुडे प्राथमिक शाळा,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,लायन्स मूक बधीर विद्यालय,वात्सल्य वृद्दाश्रम यांना अर्थिक मदत करण्यात आली आहे तेरा व्यक्तींनी मरणोत्तर देहदानाचे संकल्प केले हि कोपरगाव तालुक्यांसाठी गौरवास्पद कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याप्रसंगी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.अवयवदान व देहदान यावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले.ग्रामीण भागात प्रथमच असा कार्यक्रम झाल्याने लोकांमध्ये कुतुहल होते.प्रबोधनाने अनेकांच्या मनातील गैरसमज दुर झाले.उपस्थितांपैकी अनेकांना अंधश्रद्धा झुगारून विज्ञानवादी बनण्याचे आवाहान केले.

दरम्यान या वेळी तालुक्यातील अनेक केवळ वाचक सामाजिक संकेतस्थळ व वृत्तपत्रातील बातमी वाचून आले होते.चांदगुडे कुटुंबियांनी विधायक कार्यास आर्थिक मदत तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे याचे कौतुक होत आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन किरण चांदगुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड.समीर शिंदे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close