जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

प्रथम नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे कार्य संस्मरणीय-आ.काळे

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहराचे प्रथम नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे हे कोपरगाव नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते.त्यांचे कार्य संस्मरणीय असल्याचे सांगून त्यांचे कार्य अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असा आशावाद आ.आशुतोष काळे यांनी शहरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“माजी नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे यांच्या काळात काँक्रीटचे केलेले रस्ते त्यांच्या मृत्यूपश्चात पन्नास वर्षे ब्रेकर लावून फुटले नाही.उद्घाटन करणाऱ्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा तरच या कार्यक्रमाला आल्याचे सार आहे”-संजय काळे,सामाजिक कार्यकर्ते, कोपरगाव.

   कोपरगांव शहराचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सैनिक स्व.जंगुशेठ (उत्तमचंद)अजमेरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीमान गोकुलचंद विद्यालयानजिक असलेल्या चौकास त्यांचे नामकरण देण्याचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज सकाळी १०.४५ वाजता संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राजेश परजणे यांनी माजी नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे यांचा आदर्श वर्तमान नेते मंडळी घेतील व आगामी काळात चांगली कामे करतील असा शालजोडा लगावला त्या मुळे उपस्थितांत हशा पिकला होता.

  सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,नितीन औताडे,कैलास ठोळे,दत्तू कोल्हे,राजेंद्र झावरे,राजेंद्र जाधव,अशोक रोहमारे,विजय वहाडणे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे,दिलीप अजमेरे, दत्तात्रय जगताप आदीसह आगामी काळात नगरपरिषद निवडणूक असल्याने झाडून सर्व नेते आणि कार्यकर्ते  उपस्थित होते.

    पूढे बोलताना आ.काळे म्हणाले की,”स्व.जंगुशेठ अजमेरे हे कोपरगाव नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते.त्यांचे कार्य संस्मरणीय असल्याचे सांगून त्यांचे कार्य अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असे आशावाद व्यक्त केला आहे.या चौकाला नाव दिल्याने त्यांचे कार्याची आठवण आगामी पिढ्या नक्की ठेवतील व शहरात अन्य कामे उभे राहतील असा आशावाद व्यक्त केला आहे.

   यावेळी बिपीन कोल्हे आपण माजी नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे यांचे कार्य आपण या शाळेत असताना पाहिले असल्याचे सांगितले आहे. कोपरगाव शहरात जे मोजके स्वातंत्र्य सैनिक होते.त्यात त्यांचा समावेश होता.काँक्रिट रस्ते त्यांच्या काळात झाले आहे.आजही ते आपल्याला दिसून येतात.दिलीप शेठ अजमेरे यांनी अनेक चढउतार पाहिले पण चुकीचा मार्ग पत्करला नाही असे कौतुक केले आहे.त्यागी नेत्यांचे स्मरण तरुणांनी केले पाहिजे.

  “कार्यक्रम संपण्याआधी तालुक्यातील प्रमुख नेते निघून गेल्याबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली असून ही घटना धक्कादायक असल्याने प्रतिपादन त्यांनी करून प्रथम नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्या आदर्शावर काम करण्याबाबत कोणी नेते बोलत नाही किंबहुना त्यांनी तो नैतिक अधिकार गमावला असल्याची टीका संदीप वर्पे यांनी केली आहे.

  यावेळी संदीप वर्पे यांनी कार्यक्रम संपण्याआधी तालुक्यातील प्रमुख नेते निघून गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून ही घटना धक्कादायक असल्याने प्रतिपादन त्यांनी करून प्रथम नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्या आदर्शावर काम करण्याबाबत कोणी नेते बोलत नाही किंबहुना त्यांनी तो नैतिक अधिकार गमावला असल्याचे सांगून शहरात ज्यांनी शहराच्या विकासासाठी योगदान दिले त्याचे स्मरण केले पाहिजे असे आवाहन शेवटी वर्पे यांनी केले आहे.

  यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी स्व.जंगुशेठ अजमेरे यांच्या कार्याचे स्मरण केले व या नेत्याच्या कार्यक्रमाला नेत्यांना वेळ मिळत नाही ही शोकांतिका आहे.त्यांच्या पाठोपाठ त्यांचे लाभार्थी निघून गेले असल्याचे सांगून टोला लगावला आहे.आगामी निवडणूक बिनविरोध होणार असेल तर आपण माघार घ्यायला तयार असल्याचे सांगून निवडणुकीत गुगली टाकून दिली आहे.त्याचा काय परिणाम होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   सदर प्रसंगी प्रास्ताविक किरण गोरे यांनी केले त्यावेळी उपस्थिताना दत्तू कोल्हे,संदीप वर्पे,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.सूत्रसंचालन डॉ.अमोल अजमेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कैलास ठोळे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close