आंदोलन
संगमनेर रस्त्याचे आणखी वीस लाख पाण्यात,कामाची चौकशी करा-मागणी

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे पुण्यास जाणाऱ्या रस्त्यावर झगडेफाट्या जवळ झालेल्या २५० मीटर रस्त्याचे काम होऊन अद्याप पूर्ण पाच महिने उलटले नसताना व भागवत वाडी येथील काही काम बाकी असताना त्या रस्त्याची पहिल्याच पावसात वाट लागली असून यासाठी खर्च झालेले सुमारे वीस लाख रुपये पाण्यात गेले असल्याने या भागातील प्रवाशी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

“कोपरगाव तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची एक वर्षाच्या आत वाट लागली असून अधिकाऱ्यांनी दुसऱ्या थरात सदर रस्त्याचे काम चांगले होईल अशी केलेली बतावणी मोठी थाप ठरली आहे.त्याची मागीलवर्षी पहिल्याच पावसात फज्जा उडाला होता.त्यावर खर्च झालेले १० कोटी रुपये पाण्यात गेले आहे.त्यानंतर आणखी एक कोटी रुपयांची पुन्हा एकदा वाट लागली असल्याने या रस्त्याच्या कामाची त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करावी”- गंगाधर रहाणे,तालुका प्रमुख,शिवसेना उध्दव गट.
कोपरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणाऱ्या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची एक वर्षाच्या आत वाट लागली असून अधिकाऱ्यांनी दुसऱ्या थरात सदर रस्त्याचे काम चांगले होईल अशी केलेली बतावणी आता मोठी थाप ठरली असल्याचे उघड झाले असताना व त्याची मागीलवर्षी पहिल्याच पावसात फज्जा उडाला होता.त्यावर खर्च झालेले १० कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा माध्यमात होऊन त्याची बातमी ताजी असताना गत पावसाळा संपल्यावर दिवाळी झाल्यावर झगडे फाट्याजवळ सुमारे दोनशे मीटर काम खराब झाले होते.त्या ठिकाणी खड्ड्यांचा महापूर आला होता.परिणामी त्या ठिकाणी असलेले २५० मीटर काम करणे व संगमनेर हद्दी जवळ भागवतवाडी जवळ खराब झालेले सुमारे एक किमी काम करण्यासाठी सरकारच्या बांधकाम विभागाने पुन्हा जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.त्यातील २५० मीटरचे झगडेफाटा येथील उड्डाण पुलाच्या लागून नैऋत्येस असलेले काम दिवाळी नंतर सुरू केले होते. त्यातील सगंमनेर तालुक्यातील भागवतवाडी नाजिक् असलेले काम सुरू केलेले नाही.यातील झगडेफाटा येथील काम पहिल्या कामासारखेच उद्ध्वस्त झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान डांबर काम करताना अधिकारी आणि ठेकेदार सदर खडीस डांबराचा केवळ नैवद्य दाखवत असल्याने सदर काम पहिल्याच पावसात बोऱ्या वाजवत आहे.याबाबत मागील रस्त्याचे पोहेगाव आणि जवळके परिसरात केलेल्या खराब कामापासून सदर बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी कोणताही बोध घेतला असल्याचे दिसून आलेले नाही.परिणामी झगडे फाटा येथे केलेले २५० मीटर कामाचा व सुमारे २०-२५ लाख रुपयांचा अवघ्या पाच महिन्यात फज्जा उडाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात कामाचा दर्जा ही मोठी शोकांतिका ठरली आहे.मागील दहा वर्षाच्या काळात जशी निकृष्ट कामे झाली त्याच पद्धतीने आगामी काळात त्याचा कित्ता गिरवला जात आसल्याने उघड झाले आहे.त्यामुळे रस्ते हे नागरिकांना आणि प्रवाशांना प्रवासासाठी बांधले जातात या संकेताला गत दहा वर्षात छेद गेला आहे.त्याचीच पुनरावृत्ती वर्तमान आ.आशुतोष काळे यांच्याही काळात सुरू आहे.त्यामुळे देशभर पायाभूत रस्त्याच्या कामाचे चित्र बदलत असताना कोपरगाव आणि राहाता आदी तालुके मात्र हे नेते आणि अधिकारी ठेकेदार आदींना करण्यासाठी कुरण ठरत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आगामी पाच वर्षात यात कोणताही बदल दिसणार नाही असेच चित्र दिसून येत आहे.त्यामुळे मतदारांनी मतासाठी घेतलेल्या पैशाची किंमत त्यांना जिवानिशी चुकवावी लागत असल्याचे उघड होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची एक वर्षाच्या आत वाट लागली असून अधिकाऱ्यांनी दुसऱ्या थरात सदर रस्त्याचे काम चांगले होईल अशी केलेली बतावणी आता मोठी थाप ठरली असल्याचे उघड झाले आहे.त्याची मागीलवर्षी पहिल्याच पावसात फज्जा उडाला होता.त्यावर खर्च झालेले १० कोटी रुपये पाण्यात गेले आहे.त्यानंतर आणखी एक कोटी रुपयांची पुन्हा एकदा वाट लागली असल्याने या रस्त्याच्या कामाची त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उध्दव गटाचे तालुका प्रमुख गंगाधर रहाणे यांनी केली आहे.