जाहिरात-9423439946
सहकार

…या संस्थेच्या ठेवी विक्रमी पातळीवर-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात स्थापन झालेल्या समता पतसंस्थेने सन २०२२-२०२३ चा आर्थिक अहवाल सालाबादा प्रमाणे या वर्षी देखील दुपारी ४ वा. प्रसिद्ध केला असून ३१ मार्चला अहवाल प्रसिद्ध करण्याची परंपरा या वर्षी देखील कायम ठेवली आहे.या आर्थिक वर्षात ठेवीत वाढ होऊन त्या ७९२.५१ कोटी रुपये झाल्या असल्याची माहिती सांथेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली आहे.त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

“समता पतसंस्थेची सभासद संख्या ३१ मार्च २०२३ पर्यंत तब्बल ९०,२४४ इतकी झाली आहे.समता पतसंस्थेचे हे सर्व व्यवहार केवळ १३ शाखांच्या माध्यमातून झालेले आहे.प्रति शाखा ठेवींचा विचार केल्यास प्रति शाखा सरासरी ६५ कोटी रुपये पर्यंत ठेवींचा आकडा जात आहे हा महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीतील विक्रम आहे”-संदीप कोयटे,संचालक,समता नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव.

या बाबत बोलतांना समताचे संचालक संदीप कोयटे म्हणाले कि,’‘समताच्या ठेवी ३१ मार्च २०२२ अखेर ६६१ कोटी इतक्या होत्या त्यात २० टक्के इतकी वाढ होऊन ३१ मार्च २०२३ अखेर ७९२.५१ कोटी रुपयांच्या झाल्या असून कर्ज वाटप ५५८ कोटी रुपये झाले आहे.

समता पतसंस्थेने ३१ मार्च २०२३ रोजी १३५० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला असून ठेवींमध्ये तब्बल १३१ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी ७९२.५१ कोटी रुपये एवढ्या झाल्या तसेच कर्ज वाटपामध्ये ३१.८५ कोटी रुपयांची वाढ होऊन संस्थेचे एकूण कर्ज वाटप ५५८ कोटी एवढे झाले असून गुंतवणुक २७५ कोटी एवढी आहे. संस्थेला ३१ मार्च २०२३ अखेर ५ कोटी ७१ लाख इतका ढोबळ नफा झालेला आहे.सहकार खात्याच्या निकषानुसार वैज्ञानिक तरलतेची गुंतवणूक ही एकूण ठेवीशी २५ टक्के इतकी असावी लागते,म्हणजेच २०० कोटी गुंतवणूक आवश्यक असताना संस्थेने २७५ कोटी इतकी सुरक्षित गुंतवणूक केली असल्याची माहिती संस्थेचे संचालक कोयटे यांनी दिली आहे.

तसेच समता पतसंस्थेने वसुली बाबतही आघाडी कायम राखली असून संस्थेच्या शाखांपैकी वैजापूर, राहुरी, राहाता, पुणे, गांधी चौक या शाखांनी ० टक्के एन.पी.ए.राखण्यात यश मिळविले आहे.तर शिर्डी,नाशिक,येवला यांनी २ % एन.पी.ए.राखला आहे. इतर शाखा अल्प एन.पी.ए.राखण्यात यशस्वी झाल्या आहेत.

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले कि,”समताने ठेव वाढ,कर्ज वाढ व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापित केले आहे.बँकिंग क्षेत्रातील कर्ज वाटपापैकी अत्यंत सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे,समताचे सोनेतारण कर्ज ३१ मार्च २०२२ अखेर १७१ कोटी रुपये इतके होते,त्यात ६६ कोटी रुपयांची वाढ होऊन ते आता २३७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.सोने तारण कर्जामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून ० % रिस्क सोनेतारण कर्जात आणण्यात यश मिळविले आहे.सहकार खात्याच्या नियमानुसार ७० % इतका अपेक्षित आहे तो संस्थेने ७० % इतकाच राखलेला आहे.

त्याचबरोबर सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्थात सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतात.त्यामुळे संस्थेचे कामकाज बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

समता पतसंस्थेची सभासद संख्या ३१ मार्च २०२३ पर्यंत तब्बल ९०,२४४ इतकी झाली आहे.समता पतसंस्थेचे हे सर्व व्यवहार केवळ १३ शाखांच्या माध्यमातून झालेले आहे.प्रति शाखा ठेवींचा विचार केल्यास प्रति शाखा सरासरी ६५ कोटी रुपये पर्यंत ठेवींचा आकडा जात आहे हा महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीतील विक्रम आहे.

सोने तारण कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या प्रमाणात ४२% इतके आहे.संस्थेची सुरक्षित गुंतवणूक आणि सोनेतारणासारखे अति सुरक्षित कर्ज याचे एकूण ठेवींशी प्रमाण ६४.६०% इतके आहे.त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक व कधीही वसूल होऊ शकणारे सोनेतारण कर्ज या आधारावर समताच्या ९९.६९ % ठेवीदारांच्या २५ लाख रुपयांच्या ठेवी सुरक्षित आहे. तसेच उर्वरित २५० कोटी रुपयांचा ठेवीसाठी २९४ कोटी इतक्या रुपयांचे सुरक्षित कर्ज वाटप केले आहे. वरील सर्व आर्थिक परिस्थितीचा विचार करता समता पतसंस्था ही महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित नागरी सहकारी पतसंस्था म्हणून गणली जाते.

समताने केवळ कर्ज वाटप न करता मायक्रो फायनान्सने दिलेल्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालास, स्वदेशी उत्पादनास भारतभर ऑनलाईन विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार उद्यमीच्या माध्यमातून ‘सहकार उद्योग मंदिर व समता सहकार मिनी मॉल’ अंतर्गत स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादने उपलब्ध करून दिली आहे.समता महिला बचत गटाद्वारा ‘समता सहकार मिनी मॉल’ सुरु करून कोपरगाव तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ व विक्री केंद्र उपलब्ध करून दिली असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक त्यांनी दिली आहे.

समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे,तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे.मोबाईल बँकिंग,ऑनलाइन बँकिंग,त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्व प्रथम आणून पेपरलेस बँकिंग प्रणाली प्रत्यक्षात आणली आहे.

‘कर्ज वितरण करताना देखील समता पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणालीचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. नेटविन इंडिया सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली शुअर सेल, शुअर पेमेंट या प्रणाली मार्फत देखील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक क्षेत्रात तर समता परिवार नेहमीच अग्रभागी असतो. कोरोना काळात अल्पावधीत समता परिवाराने दररोज ९०० गरजूंना घरपोहोच जेवणाचे डबे पुरविले होते.कोरोना संपला तरीही ६० गरजू, निराधार कोपरगावकरांना घर पोहोच भोजनाचे डबे पाठविण्याचा उपक्रम अद्यापही सुरु आहे.

यावेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,ज्येष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल,जितूभाई शहा,चांगदेव शिरोडे,कचरू मोकळ,महाव्यवस्थापक संचिन भट्टड आदींसह मुख्य कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close