जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडे प्रकल्पांचे…हे काम कोण करणार-कालवा कृती समितीचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   अ.नगर-नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या भागाला नुकतेच निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.या पाण्यामुळे शेकडो गावातील पिण्याचे तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार असला तरी अद्याप अकोले तालुक्यातील कालव्यांच्या दोन्ही बाजूच्या नाल्यांचे (साईड गटारींचे) काम जलसंपदा विभागाने अपूर्ण ठेवले असल्याने त्यातून शेतकऱ्यांच्या शेताचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे जलसंपदा विभागाने सदर भुसंपादित क्षेत्रातील
बाजूच्या नाल्या (साईड गटार) तातडीने पूर्ण कराव्या अशी महत्वपूर्ण मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक गांडोळे यांनी जलसंपदा विभाग संगमनेर यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

 

“जलसंपदा विभागाने निळवंडे कालव्यांस दि. १० ऑगस्ट रोजी पाणी सोडले होते.मात्र यावेळी जलसंपदा विभागाने पुन्हा एकदा तीच चूक केली असून अकोले तालुक्यातील कालव्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड गटारींचे काम पूर्ण केलेले नाही.परिणाम स्वरूप कालव्यांच्या सखल भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी जाऊन त्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.याला कोण जबाबदार आहे”- अशोक गांडोळे,अध्यक्ष,संगमनेर तालुका,निळवंडे कालवा कृती समिती.

   “निळवंडे कालवा कृती समितीने विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी ऍड.अजित काळे यांच्या सहाय्याने उच्च न्यायालयातील जनहित याचिकेद्वारे व  रस्त्यावरील लढ्याच्या पाठपुराव्याने जलसंपदा विभागाने मागील वर्षी ३१ मे रोजी जलपूजन केले.परंतु त्याचे वाजत गाजत प्रवरा काठच्या सत्ताधारी व विरोधी मंडळींनी आपल्या अंगावर नसल्या कामाचा गुलाल उधळून दिवाळी साजरी केली होती.एकदा नव्हे तर दोनदा जलपूजन करून आपले आणि आपल्या आगामी पिढ्यांच्या मतांची बेगमी केली होती.त्यानंतर निळवंडे कालवा कृती समितीच्या पाठपुराव्याने दिनांक ३१ जुलै व ०५ ऑगस्ट २०२४ रोजी डाव्या उजव्या कालव्याच्या सुमारे ८५२ कोटींच्या वितरण पाईप चाऱ्यांच्या निविदा प्रसिद्ध केल्या असून आगामी तीन वर्षात सदर काम सर्वात आधुनिक पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे.तो पर्यंत या दुष्काळी गावांची व पशुधनाचा चारा आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी या गावातील पाझर तलाव भरणे गरजेचे असल्याने कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती त्यास अनुसरून जलसंपदा विभागाने दिनांक १० ऑगस्ट रोजी पाणी सोडले होते.

“उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांनी ५०-५५ वर्षे सत्ता भोगूनही निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना ते पाणी देऊ शकले नाही.उलट कालवे बंद ठेवून त्यांच्या मद्य कारखान्यांना पाणी चोरून वापरत होते.कालव्यांच्या कामात पडद्याआडून अडथळे आणत होते.आणि आता संगमनेर कारखान्याच्या उत्तरेस निळवंडेच्या लाभक्षेत्राबाहेर दुष्काळी गावांना पाणी देण्याचे निवडणूकपूर्व स्वप्न दाखवून शेजाऱ्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या पदरी पुण्य जमा करण्याचे बिगर खर्चिक काम त्यांनी सुरू केले आहे ही बाब निंदनीय आहे”- नानासाहेब गाढवे,ज्येष्ठ नेते,निळवंडे कालवा कृती समिती.

  दरम्यान यावेळी जलसंपदा विभागाने पुन्हा एकदा तीच चूक केली असून अकोले तालुक्यातील कालव्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड गटारींचे काम पूर्ण केलेले नाही.परिणाम स्वरूप कालव्यांच्या सखल भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी जाऊन त्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.याला कोण जबाबदार आहे.निळवंडे कालव्यांच्या जलपुजनाचे श्रेय घेणारे याबाबत सविस्तर मौन पाळून असून आगामी विधानसभा निवडणुका पाहून त्यांनी लभक्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रास पाणी देण्याचे स्वप्नरंजन सुरू करून त्याचे व्हिडिओ आपल्या पित्यामार्फत समाज मांध्यमावरून प्रसार करून आपल्या सत्तेच्या पोळ्या भाजण्याचे काम सुरू केले आहे.त्यांना पाणी द्यायचे असेल तर बारमाही प्रकल्प असलेल्या भंडारदऱ्याच्या पाण्यातून द्यावे.अथवा नवीन पाणी निर्माण करण्याची दानत दाखवावी.५०-५५ वर्षे सत्ता भोगून आपण निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देऊ शकला नाही.उलट कालवे बंद ठेवून आपल्या मद्य कारखान्यांना पाणी चोरून वापरत होता.कालव्यांच्या कामात पडद्याआडून अडथळे आणत होता.आणि आता संगमनेर कारखान्याच्या उत्तरेस दुष्काळी गावांना पाणी देण्याचे निवडणूकपूर्व स्वप्न दाखवून शेजाऱ्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या पदरी पुण्य जमा करण्याचे बिगर खर्चिक काम सुरू केले असल्याचा आरोप केला आहे.
संगमनेर व राहाता तालुक्यातील नेत्यांनी अकोले तालुक्यातील कि.मी.०१ ते २८ डावा कालवा तर ०१ ते १८ कि.मी.उजवा कालव्यांच्या अधिग्रहित जागेत दोन्ही बाजूची नाली (साईड गटार)करून त्यांची मागील नुकसान भरपाई देऊन अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे असे आवाहन अशोक गांडोळे यांनी केले आहे.त्यामुळे निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामात ५४ नापास झालेल्या उत्तर जिल्ह्यातील नेत्यांनी याबाबत आपले तोंड उघडावे असे आवाहन गांडोळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close