कोपरगाव शहर वृत्त
देशभक्त नागरिकांची भव्य तिरंगा मशाल फेरी !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यानी २८भारतीय निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानी अतिरेक्यांवर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केल्यावर त्या पित्यर्थ विजयी रॅली तर देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभक्त कोपरगावकरांनी सर्वपक्षीय भव्य तिरंगा मशाल रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून काढण्यात आली होती.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

भारताने ०६-०७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तर दिले.भारताने पाकिस्तानात घुसून ०९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले असून त्या हल्ल्यात जवळपास १००हून अधिक दहशत वादी ठार झाले आहे.या शिवाय व क्षेपणास्त्र हल्ल्याने जवळपास दहा विमानतळांची धावपट्टी उद्ध्वस्त झाली आहे.त्याचे कोपरगावसह देशभर कौतुक होत आहे.
दि.२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ०६-०७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तर दिले.भारताने पाकिस्तानात घुसून ०९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले असून त्या हल्ल्यात जवळपास १००हून अधिक दहशत वादी ठार झाले आहे.या शिवाय व क्षेपणास्त्र हल्ल्याने जवळपास दहा विमानतळांची धावपट्टी उद्ध्वस्त झाली आहे.ज्यामध्ये ४५ हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहे.त्यामुळे पाकिस्तानला भारताशी तात्काळ युद्ध संधी जाहीर करावी लागली आहे.त्या पित्यर्थ कोपरगाव शहरातील नागरिकांनी आज सर्वपक्षीय विजयी रॅली काढली होती.

सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,बी.एस.एन.एल.चे केंद्रीय संचालक रवींद्र बोरावके,मंदार पहाडे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले आदीसह मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.

सदर प्रसंगी या रॅलीची सुरवात भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली.या रॅलीत भारतमातेची वेशभूषा धारण केलेल्या भारतमाता,मिसाईल,एस.४०० क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीची प्रतिकृती व २६० फूट लांबीचा राष्ट्रध्वज नागरिकांनी सदर केला होता.

सदरची रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,वीर सावरकर चौक,पॉवर हाऊस,डॉ.सी.एम.मेहता स्कूल,गांधीनगर,एस.जी.विद्यालय,राम मंदिर रोड,छत्रपती संभाजी महाराज चौक,नवीन नगरपरिषद माधव बाग,पोस्ट ऑफिस,मार्गे काढण्यात आली या रॅलीची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी सर्व पक्षीय सर्व धर्मीय महिला पुरुष देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे राष्ट्रप्रेम जागृत होण्यास मदत मिळाली असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.