जाहिरात-9423439946
अपघात

कोपरगाव तालुक्यात अपघात,अनेक जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे ग्रामपंचायत हद्दीतील जुना मुंबई नागपूर या जुन्या राज्यमार्गावर हॉटेल निसर्ग जवळ वऱ्हाडच्या पिकअप गाडीला अन्य वाहनाने हुलकावणी दिल्याने महिंद्रा पिकअप हे वाहन
(क्रं.एम.एच.१५ जे.सी.१०२३)रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीतील उलटून पाण्यात पडल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे.या अपघातात तब्बल ०८ जण जखमी झाले असले तरी मोठी जीवितहानी टळली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या अपघातात अपघातग्रस्त वाहनाचा पुढील भाग वर पाण्याचे वर राहिल्याने मोठी जीवित हानी टळली आहे.

दरम्यान पिकअप मधील सहा जण कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्ती तर दोन जण रवंदे येथील होते.हे सर्व रवंदे येथून खुलताबाद येथे लग्नाला जात असताना ही दुर्घटना घडली मात्र त्यांचे दैव बलवत्तर म्हणून सर्व जण या अपघातातून सुखरूप बचावले आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान या अपघातानंतर नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती व जखमींना तत्काळ वर काढुन उपचारार्थ खाजगी दवाखान्यात रवाना केले आहे.
  दरम्यान एक जण विहिरीत असल्याची शंकाही उपस्थित नागरिकांकडून वर्तविण्यात येत असल्याने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विद्युत पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसून विहिरीत कोणी आहे याची खातरजमा करत असल्याचे वृत्त आहे.

उपस्थितांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमींना उपचारासाठी कोपरगाव खाजगी रुग्णालय तर अन्य काहींना वैजापूर येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते.

घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,पोलीस कॉन्स्टेबल आंबादास वाघ,जयदीप गवारे,कोतकर,पोलीस नाईक साळुंके आपल्यासहकाऱ्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान याबाबत पुढील तपास पो.नि.वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close