जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या योजनेतून समाजाशी एकरूप होण्याचे शिकण-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   आयुष्यातील आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाज व देशाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव होत असून समाजाशी एकरूप कसे व्हायचे याची शिकवण मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे आहे.महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे,क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे,प्रौढ शिक्षण,गलिच्छ वस्त्यांची सफाई,प्रथमोपचार,नागरी संरक्षण आदींचे शिक्षण देण्यात येते.


पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील मढी खु.येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब कुऱ्हाडे होते.

   सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे,एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुनील बोरा,मोहन आभाळे,श्रीधर आभाळे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,उपसरपंच लिना आभाळे,बिपीन गवळी,रविंद्र आभाळे,गायत्री गवळी,मनीषा आभाळे,भिमाजी माळी, सुखदेव भागवत,आबासाहेब आभाळे,प्रमोद आभाळे,किरण आभाळे,अशोक आभाळे,ग्रामसेवक किरण राठोड,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होवून विद्यार्थ्यांमध्ये नियोजनात्मक कला विकसित होते.निवासी शिबिरातून सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात.त्यांना समाजासोबत मिळून मिसळून राहायची व श्रम संस्कारातून समाजाशी एकरूप होण्याची शिकवण मिळते व या समाजसेवेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

या प्रसंगी प्रास्तविक प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सागर मोरे यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

मढी खु.येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना चैताली काळे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close