जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दुष्काळ

“देर आये दुरुस्त आये ‘ जनता दरबाराची स्थिती !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
  
  
   कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पाणी टंचाई आढाव्यासह जलजीवन मिशन योजना,जिल्हा परिषद जलजीवन योजना,मृद संधारण,जल निस्सारण योजनांच्या आढाव्यासाठी आज दुपारी ०२ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता.त्यात आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना प्रत्येक योजना निहाय घेरल्याचे दिसून आले आहे.मात्र दुष्काळ केवळ महिनाभर राहिला असल्याने त्यांची आजची कृती ही,”ते दर आये; दुरुस्त आये ‘ या व्याख्येत फिट बसली दिसून आले आहे.त्यामुळे संबधित अधिकारी केवळ कालहरण करण्यासाठी या बैठकीचा उपयोग करणार आहे यातून दुसरे काही ही निष्पन्न होणार असल्याचे उघड उघड दिसत असल्याची उपस्थितात चर्चा आढळून आली आहे.

नाटेगाव येथील जलजीवन पाणी योजनेबाबत काम पूर्ण नसताना ग्रामपंचायतीने काम संपूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ठेकेदार याला दिले असल्याचा सनसनाटी आरोप येथील ग्रामपंचायत सदस्य किरण मोरे यांनी केला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

   कोपरगाव विधानसभा मतदार संघात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी एका आठवड्यात आ.आशुतोष काळे यांनी लागोपाठ दोन टंचाई बैठका घेतल्या आहेत.हीच तत्परता त्यांनी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात दाखवली असती तर आज जलजीवन योजना मार्गी लागल्या असत्या किंवा विधानसभा सभागृहात याबाबत आवाज उठवला असता तर आर्थिक तरतूद होऊन आज पाण्याची अवघड स्थिती दिसली नसती.मात्र सुरुवातीच्या काळात यशाच्या धुंदीत नेमकी जबाबदारी विसरली गेली असल्याचे मतदारांना दिसून आले आहे.परिणामी जो परिणाम व्हायचा तोच झाला आहे.आता उशीर झाला असून आगामी पंधरा दिवसात रोहिणी नक्षत्र लागू शकते व त्यावेळी पाऊस हजेरी लावू शकतो.त्यामुळे आज कितीही नागरिकांनी कंठशोष केला तरी जलजीवन योजना पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही.कामे गेल्या दीड दोन वर्षापासून बंद असल्याचे काम सोडून गेलेले मजूर,यंत्रे आणि न सापडणारे ठेकेदार आता रुळावर आणणे सोपे राहिलेले नाही.बैठकांना बोलावून सदर ठेकेदार वारंवार गैरहजर राहत असल्याचे दिसून आले आहे.ते अधिकाऱ्यांना जुमानत नव्हतेच पण आता लोकप्रतिनिधींना जुमानत नाही असे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे.त्यांना गेले अडीच तीन वर्षे कामांची बिले मिळत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदस्तरावर आंदोलने केली होती.आता कुठे त्यांची बिले काही अंशी मिळत आहेत.मात्र व्याज आणि देणेदारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांना ही बिले काही काळही समाधान देऊ शकणार नाही असे चित्र आहे.त्यामुळे आगामी बिलासाठी पुन्हा एकदा ते बिलांसाठी सरकारकडे तगादा लावणार आहे.परिणामी त्यांचे तेच तेच रडगाणे ऐकू येणार आहे.त्यामुळे या बैठकीचे फार काही साध्य होण्याची शक्यता नाही अशी चर्चा उपस्थितात आढळून आली आहे.

जलजीवन योजनेबाबत उत्तर देताना जलजीवन मिशन चे उपअभियंता सी. डी.लाटे दिसत आहेत.

वेस बंधारा ते अंजनापुर नदीजोड प्रकल्पाबाबत दोन वर्षांपासून कोणतीही प्रगती झाली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी लक्षात आणून दिले आहे.त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाण्यापासून अंजनापुर,धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापूर आदी पाच गावे वंचित राहिली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे लाखो रुपये खर्चून नाहक उजणीचे ढोल बडविण्याची वेळ येत असल्याचा आरोप केला आहे.

   सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,साई संस्थानचे माजी विश्वस्त संभाजी काळे,अजित पवार राष्ट्रवादीचे
तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर,गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय आगवण,जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष कृष्णा काळे,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,जलजीवन योजनेचे उपअभियंता सी.डी.लाटे,जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता श्री लोहार,वाल्मीक कोळपे,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सरपंच,कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

   त्यावेळी बऱ्याच वेळा अधिकारी आणि ठेकेदार आदी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असताना दिसत होते.त्याचे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कार्यकर्ते खंडन करत असताना दिसत होते.एका पदाधिकाऱ्याने तर मळेगाव थडी मधील साठवण तलावाचे काम पूर्ण होत नसल्याने मुले क्रिकेट खेळण्यासाठी वापर करत असल्याचा आरोप केला आहे.

तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याच्या नाकाखाली असलेल्या सुरेगाव पाणी योजनेची मोठी बोंब आढळून आली असून या प्रकरणी प्रशांत वाबळे,माजी सरपंच वाल्मीक कोळपे,मोतीलाल निकम यांनी आवाज आहे.मोतीराम निकम यांनी आरोप करताना जलजीवन मिशनच्या पाण्याच्या टाक्यांचे काम निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे.त्या कधीही पडतील अशी स्थिती असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यांचा कधीही अपघात होऊ शकतो.आ.काळे यांच्या या बालेकिल्ल्यात नागरिक पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप केला आहे.दुर्बल व सामान्य नागरिक प्रत्येक जण विकत पाणी घेऊ शकत नाही ही बाब लक्षात आणून दिली आहे.तर सुरेगाव परिसरात वाळू चोरांचा रात्रंदिन हैदोस सुरू आहे ते कोणालाही जुमानत नसल्याचा आरोप निकम यांनी शेवटी केला आहे.

   जेऊर पाटोदा पाणी योजनेबाबत तीच बोंब आढळून आली असून याबाबत बोलताना माजी उपसरपंच भाऊसाहेब भाबड म्हणाले की,”या योजनेचे काम तीन वर्षात पूर्ण झाले नाही.आता किती दिवसात पूर्ण करणार ? नव्या कामात जुन्या जलवाहिन्या कशा वापरत आहे असा सवाल त्यांनी केला आहे.जुन्या टाक्या वापरल्या तर त्यांची लवकरच माती होईल आणखी एक टाकी वाढवावी लागेल.जुन्या टाकलेल्या पाईप लाइन ठेकेदार यांना सापडणार नसल्याचा आरोप केला आहे.

  तर नाटेगाव येथील पाणी योजनेबाबत काम पूर्ण नसताना ग्रामपंचायतीने काम संपूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ठेकेदार याला दिले असल्याचा सनसनाटी आरोप येथील ग्रामपंचायत सदस्य किरण मोरे यांनी केला आहे.

  दुष्काळी गणलेल्या रांजणगाव देशमुख प्रादेशिक नळ पाणी योजनेचे काम अपूर्ण आहे निधी नसल्याचा कांगावा ठेकेदार करत असल्याचा आरोप तेथील कार्यकर्ते गजानन मते यांनी केला आहे.जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता श्री.लोहरे यांनी मात्र ठेकेदार यास निधी दिला असल्याचे समर्थन केले आहे.बहादरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी योजना ७० टक्के अपूर्ण असल्याचे सांगितले आहे.पहिली योजना ११ कोटी निधी खर्च होऊनही ग्रामस्थांना पाणी न मिळूनही मातीमोल झाली असल्याचे ठासून सांगितले आहे.तर वीज बिल कमी करण्यासाठी व सौर योजना उभी करण्यास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.आ.काळे यांनी कालव्यालगत जागा मिळणार नाही अन्यत्र उपलब्ध करावी अशी सूचना केली आहे. दरम्यान जागे अभावी काम बंद करू नका अशी विनंती सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी केली आहे.

   किशोर चोरगे यांनी दारणा धरणातील गाळ काढून मुक्त केले तर अडीच टी.एम.सी.शिल्लक असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे याबाबत विधानसभा निवडणुकीत याबाबत आवाज उठवावा असे आवाहन केले आहे.

   त्यावेळी जलसंधारण योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे.मात्र वेस बंधारा ते अंजनापुर नदी जोड बाबत दोन वर्षांपासून कोणतीही प्रगती झाली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी लक्षात आणून दिले आहे.त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाण्यापासून अंजनापुर,धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापूर आदी पाच गावे वंचित राहिली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे नाहक उजणीचे ढोल बडविण्याची वेळ येत असून त्यावर लाखो रुपयांचा देखभाल आणि वीज बिलाचा खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close