जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात पुन्हा प्रशासन घेणार कठोर भूमिका ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात व तालुक्यात कोरोना विषाणूने उचल खाल्याने पून्हा प्रशासन तणावात आले असून आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन मुखपट्टी न वापरणाऱ्या व सरकारी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कठोर भूमिका घेणार असून आज संपन्न झालेल्या आ. आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आता या पुढे कोपरगाव शहर व तालुक्यात प्रवेश करताना आरोग्य तपासणी अहवाल व परजिल्हयांतून येण्याचा परवाना आवश्यक असणार आहे.बाहेर नागरिकांना फिरताना आता मुखपट्टी आवश्यक असणार आहे.शिवाय अनावश्यक गर्दी,सार्वजनिक जागी थुंकणे आदी अग्रहक्काना मुकावे लागणार आहे.जमावबंदी तर या आधीच लागू आहे.या नियमांचे पालन न केल्यास पोलिसांच्या प्रसादाची व नगरपरिषदेच्या दंडाची व गुन्हे दाखल करून घेण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता तालुका निरंक राहिला होता.मात्र आता करंजी येथील मूळ निवासी असलेला मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी आरोग्य विभागात शासकीय सेवेत असलेल्या एका रुग्णाची व संजयनगर आयेशा कॉलनीतील एका महिलेची कोरोना बाधितात भर पडली आहे.त्यामुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी तात्काळ करंजी व संजयनगर या ठिकाणी धाव घेऊन या रुग्णाचे नातेवाईकव संबंधी यांना ताब्यात घेण्यास सुरुवात करून जवळपास सोळा जणांची विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.त्यांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.मात्र तरीही जवळचे तालुके येवला व वैजापूर,औरंगाबाद,मालेगाव आदी बाधित शहरे नजीक असल्याने आज पर्यंत सुरक्षित ठेवलेला कोपरगाव तालुका पुन्हा बाधित होऊ शकतो हि बाब प्रशासनाच्या लक्षात आल्याने आज तहसीलदार कचेरीत तातडीची बैठक आयोजीत केली होती.त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर प्रसंगी कोपरगावचे आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी येवला व वैजापूर,संगमनेर,नाशिक जिल्हा ,औरंगाबाद जिल्हा मोठ्या प्रमाणावर बाधित असल्याने आता कोपरगाव शहराला व तालुक्याला वाचविण्यासाठी आता कठोर पावले उचलावे लागतील अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली त्याला आ. काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नागरिकांचे आरोग्य राखणे हि मोठी जबाबदारी असल्याने दुजोरा दिला आहे.त्यामुळे आता या पुढे कोपरगाव शहर व तालुक्यात प्रवेश करताना आरोग्य तपासणी अहवाल व परजिल्हयांतून येण्याचा परवाना आवश्यक असणार आहे.बाहेर नागरिकांना फिरताना आता मुखपट्टी आवश्यक असणार आहे.शिवाय अनावश्यक गर्दी,सार्वजनिक जागी थुंकणे आदी अग्रहक्काना मुकावे लागणार आहे.जमावबंदी तर या आधीच लागू आहे.या नियमांचे पालन न केल्यास पोलिसांच्या प्रसादाची व नगरपरिषदेच्या दंडाची व गुन्हे दाखल करून घेण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.या प्रकरणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दुजोरा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close